मुंबईतील इमारत बांधकामांचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ऑडिट करा, भाजपची मागणी



मुंबई खास प्रतिनिधी : मागील ८ ऑक्टोबर रोजी जोगेश्वरी पूर्व येथील पुनर्विकास स्थळावरून विट पडल्याने २२ वर्षीय संस्कृती अमीन यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. सुरक्षिततेच्या नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी सर्व बांधकाम सुरू असलेल्या जागांचे संपूर्ण मुंबईत ऑडिट करावे अशीही मागणी आमदार अमीत साटम यांनी महापालिकेला केली आहे.

दुर्घटनेच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी यापूर्वी महापालिकेत केल्या होत्या. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. जर हे खरे असतील तर संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, असे आमदार अमीत साटम यांनी बीएमसी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

आमदार अमीत साटम यांनी संपूर्ण शहरात कडक सुरक्षा तपासणी करण्याचीही मागणी केली आहे. सुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही हे तपासण्यासाठी बीएमसीने सर्व बांधकाम सुरू असलेल्या जागांचे ऑडिट करावे. कोणतेही उल्लंघन आढळून आल्यास लवकरात लवकर त्यावर उचित उपाययोजना कराव्यात. सार्वजनिक सुरक्षेच्यादृष्टीने सुरक्षा नियमांचे पालन सुनिश्चित होईपर्यंत काम थांबवण्याच्या नोटीसा द्याव्यात, असे आमदार अमीत साटम यांनी पुढे सांगितले. 

Comments
Add Comment

महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! कुठे कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, सूत्रांची माहिती

मुंबई: राज्यात सध्या सर्वांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात

मुंबई महापालिकेचा मोठा उपक्रम, गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या कामाला सुरुवात

मुंबई: महापालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गंत गोरेगावच्या दादासाहेब

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक

वांद्रे पश्चिममधील एस. व्ही. रोडवरील त्या तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून मिळणार मुक्ती

मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या

ब्रिटिशकालीन १२ वर्षांच्या पुलाचा शेवट; रेल्वे ट्रॅकवरील काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई: मुंबईतील ११२ वर्षांचा जुना आणि महत्त्वाचा ब्रिटिशकालीन रस्ता पूल, एलफिन्स्टन पूल पाडण्याच्या कामाचा