मुंबईतील इमारत बांधकामांचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ऑडिट करा, भाजपची मागणी



मुंबई खास प्रतिनिधी : मागील ८ ऑक्टोबर रोजी जोगेश्वरी पूर्व येथील पुनर्विकास स्थळावरून विट पडल्याने २२ वर्षीय संस्कृती अमीन यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. सुरक्षिततेच्या नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी सर्व बांधकाम सुरू असलेल्या जागांचे संपूर्ण मुंबईत ऑडिट करावे अशीही मागणी आमदार अमीत साटम यांनी महापालिकेला केली आहे.

दुर्घटनेच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी यापूर्वी महापालिकेत केल्या होत्या. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. जर हे खरे असतील तर संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, असे आमदार अमीत साटम यांनी बीएमसी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

आमदार अमीत साटम यांनी संपूर्ण शहरात कडक सुरक्षा तपासणी करण्याचीही मागणी केली आहे. सुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही हे तपासण्यासाठी बीएमसीने सर्व बांधकाम सुरू असलेल्या जागांचे ऑडिट करावे. कोणतेही उल्लंघन आढळून आल्यास लवकरात लवकर त्यावर उचित उपाययोजना कराव्यात. सार्वजनिक सुरक्षेच्यादृष्टीने सुरक्षा नियमांचे पालन सुनिश्चित होईपर्यंत काम थांबवण्याच्या नोटीसा द्याव्यात, असे आमदार अमीत साटम यांनी पुढे सांगितले. 

Comments
Add Comment

जो पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न बघितले तोच पुरस्कार देणारे हात झाले

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते समाजातील ४४ महिलांचा गौरव मुंबई (विशेष प्रतिनिधी) : क्षेत्र कोणतेही

पहिल्या महिला मुंबई महापालिका आयुक्त म्हणून आश्विनी भिडे यांनी स्वीकारला पदभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर ज्येष्ठ सनदी अधिकारी आश्विनी भिडे

'जागतिक अस्थिरतेच्या काळात महावीरांचा अहिंसेचा मार्गच मानवतेला तारू शकतो'

मुंबई : जागतिक पातळीवर वाढत असलेल्या युद्धजन्य परिस्थिती, हिंसा आणि असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर भगवान

लोकेश चंद्रा मुख्यमंत्र्यांचे नवे अतिरिक्त मुख्य सचिव

मुंबई : राज्याच्या प्रशासनात वरिष्ठ स्तरावर मंगळवारी मोठे फेरबदल करण्यात आले असून, १० सनदी अधिकाऱ्यांच्या

कुर्ला बस दुर्घटना प्रकरणातील आरोपी बस चालकाला जामीन

मुंबई: सव्वा वर्षापूर्वी कुर्ला पश्चिम येथे बेस्टचा भीषण अपघात झाला होता. या अपघात दुर्घटनेतील आरोपी चालक संजय

महाराष्ट्रात १६ मेपासून जनगणना, देशात प्रथमच डिजिटल पद्धतीचा वापर

मुंबई : २०२७ च्या जनगणनेचे वेळापत्रक देशव्यापी जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते