मुंबईतील कबूतर प्रकरण चिघळलं; जैन मुनींच्या वक्तव्यांवरून राजकीय वातावरण तापलं

मुंबई : मुंबईत सध्या कबूतरांमुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्यांवरून मोठा गदारोळ सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर ११ ऑक्टोबर रोजी जैन समुदायातर्फे एक विशेष धर्मसभा आयोजित करण्यात आली होती.


या सभेनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जैन मुनी निलेश यांनी ‘जन कल्याण पार्टी’ या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. “आता आम्हालाही आमची संघटना हवी आहे. महापालिकेत आमचे उमेदवार उभे राहतील. कबुतरांची देखील पार्टी असावी. जसा शिवसेनेत वाघ आहे, तसं आमचं प्रतीक कबूतर असू शकतं,” असं त्यांनी सांगितलं.


त्यानंतर जैन मुनी कैवल्य रत्न महाराज यांनी वादग्रस्त विधान करत, “डॉक्टर आणि वैज्ञानिक मूर्ख असतात असं वाटतं. एक-दोन माणसे मेल्याने फार काही बिघडत नाही. रोज हजारो सामान्य नागरिक मरतात, त्यांचा विचार सरकार करत नाही,” असे संतापजनक मत मांडले. याचबरोबर, “जैन समाज सर्वाधिक कर भरणारा आहे,” असंही त्यांनी बोलताना म्हटले. त्यांच्या विधानांनी राजकीय आणि सामाजिक वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे.


शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांचा संताप


शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. “ज्यांना कबुतरांमुळे त्रास झाला आणि त्यातून मृत्यू ओढवला, त्यांचा विचार या मुनींनी केलाय का? फुफ्फुसाच्या आजारांमुळे कित्येक लोक दगावतात. त्यांच्या घरी कबुतराचे फोटो आहेत का? ते कबुतरांची पूजा करतात का? प्रत्येक प्राणी पूजनीय नसतोच. घरात उंदीर आला तर आपण तो गणपतीचा वाहन म्हणून ठेवत नाही. त्यामुळे याप्रकारची विधाने गैरजबाबदार आहेत,” असे त्यांनी सांगितले. तसेच, या विषयावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणीही मनीषा कायंदेंनी केली.


जैन मुनींच्या वक्तव्यांवर राजकीय प्रतिक्रिया देताना अविनाश अभ्यंकर यांनी जैन समाजावर टीकास्त्र सोडलं. “कर भरता म्हणून मुंबईवर हक्क दाखवता का? मराठी माणूस मेहनतीने जगतो, कुणाला फसवून देश सोडून जात नाही. इतर प्रांतीयांना जागा दिली म्हणून मुंबईवर मालकी हक्क सांगणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


ते पुढे म्हणाले, “जर तुम्ही अहिंसावादी असाल आणि काही जण मेल्याने फरक पडत नसेल असं म्हणत असाल, तर तुमचं मत हास्यास्पद आहे. मग तुम्ही ज्या मंदिरात बसता, त्या मंदिराच्या जाळ्या काढून टाका. डॉक्टर, वैज्ञानिक हे मूर्ख नाहीत.”


मुंबईत कबुतरांमुळे वाढलेल्या आजारांवरून निर्माण झालेल्या वादात आता राजकारणाची भर पडली आहे. जैन समाजाकडून नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा, तसेच वादग्रस्त विधानांमुळे वातावरण तापले असून, या वादाचे राजकीय पडसाद पुढे कसे उमटतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून