'बाल आधार' नोंदणीतील त्रुटींनी पालक त्रस्त


यूआयडीएआयकडे तातडीने उपाययोजनेची मागणी


लहान मुलांच्या नवीन आधार नोंदणी प्रक्रियेत कागदपत्रांमधील विसंगतीमुळे पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जन्म दाखल्यावरील नावातील त्रुटी, वडिलांचे-आईचे नाव किंवा पत्त्यातील फरक यामुळे अनेक नागरिकांची 'बाल आधार' नोंदणी अडकून पडली आहे. मूळ कागदपत्रांमधील चुकांकडे दुर्लक्ष केल्याने आता आधार कार्ड काढताना मोठी डोकेदुखी वाढली आहे.


लहान मुलांच्या आधार कार्डावर (बाल आधार) मुलाचे नाव वडिलांच्या नावासह आडनावासहित तसेच आई-वडिलांचे नाव आधार क्रमांकाला जोडलेले असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक पालकांच्या जन्म दाखल्यात नाव अपूर्ण आहे किंवा आई-वडिलांच्या आधार कार्डावर असलेली नावे आणि जन्म दाखल्यावरील नावांमध्ये फरक आढळत आहे.



पालकांसमोर मोठे प्रश्नचिन्ह


नावातील किंवा पत्त्यातील किरकोळ फरकांमुळे आधार नोंदणी केंद्रावर कागदपत्रे स्वीकारली जात नाहीत. यामुळे पालक मोठ्या संभ्रमात आहेत. कोणती कागदपत्रे जोडावी? - जन्म दाखल्यातील त्रुटी आणि वडिलांच्या नावातील फरक असल्यास, नेमका कोणता पुरावा द्यावा, हा प्रश्न पालकांना भेडसावत आहे.



जन्म दाखल्यात बदल कसा करावा


मूळ जन्म दाखल्यातील चूक सुधारण्यासाठी सरकारी कार्यालयात कोणती प्रक्रिया पूर्ण करावी लागते, याबद्दल पालकांना योग्य माहिती मिळत नाही.



आधार कार्डमध्ये बदल (अपडेट) कसा करावा


मुलाच्या आधार नोंदणीसाठी पालकांच्या आधारमध्ये नाव किंवा पत्ता बदलायचा असल्यास कोणती कागदपत्रे लागतील?


या गुंतागुंतीमुळे, सामान्य नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात असून आधार नोंदणी प्रक्रिया अत्यंत जिकिरीची बनली आहे.



यूआयडीएआयकडे तातडीने उपाययोजनेची मागणी


महाराष्ट्र व्हिएलई संवाद या संघटनेने नागरिकांची ही गंभीर समस्या आधार प्रशासनाकडे (युआयडीएआय) ई-मेलद्वारे मांडली आहे. त्यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की, या समस्येवर तातडीने सुसंगत आणि सुलभ उपाययोजना जाहीर करावी.


नावातील किरकोळ त्रुटींसाठी किंवा जुन्या कागदपत्रांमधील विसंगतींसाठी पर्यायी कागदपत्रे (जसे की शपथपत्र) स्वीकारण्याची तात्पुरती व्यवस्था करावी, जेणेकरून बाल आधार प्रक्रिया सुलभ होऊन पालकांना दिलासा मिळेल.



Comments
Add Comment

Ashwini Bhide : इंधन बचतीसाठी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचा पुढाकार

मुंबई (सचिन धानजी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि हरित ऊर्जेच्या वापराबाबत

Khar tree collapse : खारमध्ये रिक्षावर झाड कोसळल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई : खार (पश्चिम) येथील लिंकिंग रोडवर राजकुमार ज्वेलर्सजवळ रिक्षावर झाड कोसळल्याने,१४ वर्षीय मुलीचा मृत्यू

NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला CBI कोठडी, नांदेडमधये पालकांची सीबीआय चौकशी

मुंबई : नीट युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी