मुंबईच्या स्वच्छतेसाठी दरवर्षी झाडूंवर दीड कोटींचा खर्च!


मुंबई (प्रतिनिधी) :  स्वच्छतेसाठी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाला झाडू खरेदीसाठी दरवर्षी दीड कोटी खर्च करावे लागत आहेत. यात ३ लाख १७ हजार किलो झाडूच्या कांड्या (ब्रूम गोवा) लागत असून सुमारे १६ हजार ५०० फुलझाडू (ब्रूम ग्रास) लागतात.


मुंबईच्या स्वच्छतेसाठी काही प्रमुख रस्त्यांवर यांत्रिकी झाडूंचा वापर केला जात असला तरी पारंपरिक झाडूंच्या सहाय्याने स्वच्छता केली जाते. यासाठी मोठ्या प्रमाणात फुलझाडू व कांड्या असलेल्या झाडू लागतात. महापालिका फुलझाडू नगाप्रमाणे विकत घेत असली तरी, काड्यांच्या झाडू बनवण्यासाठी किलोवर कांड्या विकत घेतल्या जातात. त्यानंतर या कांड्या बांधून त्याची झाडू बनवण्यात येते.


कांड्यांच्या झाडू बनवण्यासाठी ४७.८९ रुपये प्रति किलो कांड्या विकत घेतल्या जातात.


यावर्षी ३ लाख १७ हजार ५०० किलो कांड्यांसाठी १ कोटी ५२ लाख ५ हजार रुपये मोजण्यात येणार आहेत. एका फुलझाडूसाठी ५९.२० रुपये मोजण्यात येणार असून १६ हजार ५०० झाडूसाठी ९ लाख ७६ हजार ८०० रुपये मोजले जाणार आहेत. अपेक्षित दरापेक्षा झाडूंचा दर ०.२३ ते ७.५ टक्के कमी असून हा दर वर्षभर स्थिर राहणार असल्याचे पालिकेच्या घनकचरा विभागाकडून सांगण्यात आले.



Comments
Add Comment

Kabutarkhana Jain Community Dharm Sabha : कबुतर आमचं चिन्ह! जैन समाज सर्वाधिक टॅक्स भरतो, आता आमचाही पक्ष असेल; जैन मुनींची घोषणा!

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये कबूतर खाण्याचा प्रश्न (Pigeon Feeding Issue) मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. कबुतरांना

ॲप आधारित प्रवासी वाहतुकीसाठी नवीन नियमावलीची घोषणा !

मुंबई : महाराष्ट्रातील ॲपवर आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये (उदा. ओला, उबर, रॅपिडो) शिस्तबद्धता, प्रवासी

Diwali Firecracker Ban 2025 : फटाक्यांशिवाय दिवाळी? पुण्यापाठोपाठ मुंबईतही 'नो क्रॅकर'चा कडक नियम! मुंबईकरांची यंदाची दिवाळी 'शांत'?

मुंबई: "दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदा तोटा" या उक्तीप्रमाणे अवघ्या आठवड्याभरावर आलेल्या दिवाळीमुळे मुंबईतील

'बाल आधार' नोंदणीतील त्रुटींनी पालक त्रस्त

यूआयडीएआयकडे तातडीने उपाययोजनेची मागणी लहान मुलांच्या नवीन आधार नोंदणी प्रक्रियेत कागदपत्रांमधील

पोलीस स्टेशनच्या आवारात सोयीसुविधांसह ५५ हजार घरे बांधणार

प्रकल्पाचा अभ्यास व शिफारसीसाठी समिती स्थापन मुंबई  :  गणेशोत्सव असो नवरात्रोत्सव

अकरावीच्या प्रवेशासाठी ६ हजार विद्यार्थी प्रतीक्षेत

अजूनही राज्यात ८ लाख ३५ हजार जागा रिक्तच मुंबई (प्रतिनिधी) :  शाळांचे वर्ग सुरू होऊन तीन महिने