पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेमुळे शेतकऱ्यांना विशेष फायदा

मंत्री नितेश राणे यांनी दिली माहिती


मुंबई : पंतप्रधान धन धान्य कृषी योजना, राष्ट्रीय डाळी अभियान तसेच कृषी पायाभूत सुविधा निधी, पशुसंवर्धन, मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील ११०० हून अधिक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय कृषी विज्ञान परिसर, नवी दिल्ली येथे करण्यात आले. यानिमित्ताने अंधेरी येथील आयसीएआर-सीआयएफइ कॅम्पस येथे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमास केंद्रीय मत्स्यकी शिक्षण संस्थेचे सहसंचालक डॉ. नरोत्तम साहू, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अर्पिता शर्मा, तसेच संस्थेचे इतर वरिष्ठ अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.


कार्यक्रमात बोलताना मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, ‘पंतप्रधान धन धान्य कृषी योजना ही शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी आणि शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणारी एक महत्वाची योजना आहे. कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून वाटचाल करण्याचा प्रयत्न मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकार करत आहे. केंद्र-राज्य सरकारच्या समन्वयातून राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विशेष फायदा होईल. यामुळे शाश्वत शेतीला अधिक चालना मिळून उत्पादनही वाढेल. आपल्या राज्य सरकारने मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा दिला आहे. हीच योजना देशपातळीवर राबविण्यासाठी केंद्र सरकार विचार करत आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्व योजनांचा लाभ आता मच्छीमार बांधवांनाही मिळेल,’ असेही यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

चाउमीन, पिझ्झा-बर्गर.. फास्ट फूडच्या अतिसेवनाने आतड्यांना छिद्र, ११ वीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

अमरोहा : एखाद्या गोष्टीच अतिव्यसन हे नेहमीच जीवघेणं ठरत. अश्याच एका अति फास्ट फूड (जंक फूड) व्यसनाने उत्तर

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 'रत्नजडित' रामाचे आगमन; १० फूट उंच, ३० कोटींची सुवर्णमूर्ती आणि तंजावर कलेचा अजोड संगम!

अयोध्या : रामजन्मभूमी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भक्तीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. कर्नाटकातील अज्ञात