जिथे शक्य तिथे महायुती म्हणजे काय? महायुतीमध्ये नेमकं काय घडतंय? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...

नाशिक : पुढील काही महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका) निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील सगळ्या पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आज नाशिकमध्ये भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीबाबत एक मोठं वक्तव्य केले आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, "जिथे शक्य असेल, तिथे महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवणार आहोत."


फडणवीस म्हणाले, "आम्ही संघटनात्मक परिस्थितीचा आणि युती कुठे होऊ शकते याचा आढावा घेत आहोत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी विभागांच्या बैठका घेतल्या आहेत. आम्ही त्या विभागांमधील नगरपालिकाdeve, जिल्हा परिषदा आणि महापालिका यांचा आढावा घेत आहोत. तेथील पक्षाची ताकद, बूथची रचना, मागच्या निवडणुकीत काय परिस्थिती होती आणि आता काय आहे, युती कशी करायची आणि कुठे-कुठे करायची, या सगळ्या गोष्टींचा आढावा आम्ही या बैठकांमधून घेत आहोत."


नाशिकमध्ये आम्ही उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेतला आहे. या बैठकीत आम्ही कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांना पुढील मार्गदर्शन केले आहे. "मागच्या निवडणुकीत आम्हाला तिथे चांगले यश मिळाले होते, याही वेळी चांगले यश मिळेल अशी मला अपेक्षा आहे," असे फडणवीस यांनी सांगितले.


दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल बोलताना फडणवीस यांनी आधीचे एक वक्तव्य आठवण करून दिले. ते म्हणाले की, "जिथे शक्य असेल तिथे महायुती करू," असेच विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही केले होते. पाटील यांनी हे देखील स्पष्ट केले होते की, कोणत्याही परिस्थितीत कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. तिथे आपला चांगला कार्यकर्ता असेल, तर 'मैत्रीपूर्ण लढत' होईल.


तर दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर आरोप केला होता की, "भाजप एकीकडे युतीबद्दल बोलते, तर दुसरीकडे एकांतात स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा करते." त्यामुळे आता महायुतीमध्ये नेमके काय सुरू आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी युती होणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त