जिथे शक्य तिथे महायुती म्हणजे काय? महायुतीमध्ये नेमकं काय घडतंय? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...

नाशिक : पुढील काही महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका) निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील सगळ्या पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आज नाशिकमध्ये भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीबाबत एक मोठं वक्तव्य केले आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, "जिथे शक्य असेल, तिथे महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवणार आहोत."


फडणवीस म्हणाले, "आम्ही संघटनात्मक परिस्थितीचा आणि युती कुठे होऊ शकते याचा आढावा घेत आहोत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी विभागांच्या बैठका घेतल्या आहेत. आम्ही त्या विभागांमधील नगरपालिकाdeve, जिल्हा परिषदा आणि महापालिका यांचा आढावा घेत आहोत. तेथील पक्षाची ताकद, बूथची रचना, मागच्या निवडणुकीत काय परिस्थिती होती आणि आता काय आहे, युती कशी करायची आणि कुठे-कुठे करायची, या सगळ्या गोष्टींचा आढावा आम्ही या बैठकांमधून घेत आहोत."


नाशिकमध्ये आम्ही उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेतला आहे. या बैठकीत आम्ही कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांना पुढील मार्गदर्शन केले आहे. "मागच्या निवडणुकीत आम्हाला तिथे चांगले यश मिळाले होते, याही वेळी चांगले यश मिळेल अशी मला अपेक्षा आहे," असे फडणवीस यांनी सांगितले.


दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल बोलताना फडणवीस यांनी आधीचे एक वक्तव्य आठवण करून दिले. ते म्हणाले की, "जिथे शक्य असेल तिथे महायुती करू," असेच विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही केले होते. पाटील यांनी हे देखील स्पष्ट केले होते की, कोणत्याही परिस्थितीत कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. तिथे आपला चांगला कार्यकर्ता असेल, तर 'मैत्रीपूर्ण लढत' होईल.


तर दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर आरोप केला होता की, "भाजप एकीकडे युतीबद्दल बोलते, तर दुसरीकडे एकांतात स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा करते." त्यामुळे आता महायुतीमध्ये नेमके काय सुरू आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी युती होणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य