"पर्वत डगमगणार नाही!"…राजकीय वादळावर मंत्री योगेश कदम यांचं कठोर प्रत्युत्तर

मुंबई : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या विरोधात सुरू असलेल्या राजकीय कटकारस्थानांवर जोरदार प्रहार केला आहे. एका धारदार ट्वीटद्वारे त्यांनी विरोधकांना स्पष्ट संदेश दिला की, "छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही."


सततच्या षड्यंत्रावर थेट भाष्य


कदम यांनी उघडपणे सांगितले की, २०१९ पासून काही शक्तींनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला कायमस्वरूपी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मात्र, निष्ठावान शिवसैनिकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ते केवळ या संकटातून बाहेर पडले नाहीत, तर पुन्हा एकदा निवडून आले आणि त्यांची राजकीय ताकद सिद्ध झाली.


कुटुंबाला लक्ष्य केल्याबद्दल तीव्र नाराजी


२०२४ च्या निवडणुकीतील गलिच्छ राजकारणावर टीका करताना कदम यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांच्या कुटुंबियांचा वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी वापर केला गेला. विशेष म्हणजे, राजकारणापासून दूर असलेल्या त्यांच्या आईलाही जाणूनबुजून या वादात ओढण्यात आले, जो नीचपणाचा कळस होता, असे त्यांनी म्हटले.


भविष्यातील भूमिकेवर ठाम विश्वास


या सर्व नकारात्मक राजकारणाचा कोणताही परिणाम आपल्यावर होणार नाही, असा ठाम आत्मविश्वास मंत्री कदम यांनी व्यक्त केला आहे. "राजकारणात सर्व गोष्टींना तोंड द्यावं लागतंच. परंतु, या घाणेरड्या राजकारणामुळे मी कधीच विचलित झालो नाही आणि पुढेही होणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.


आपला निश्चय व्यक्त करताना त्यांनी शेवटी सांगितले की, "मी माझं काम, माझी जबाबदारी आणि माझं कर्तव्य यापुढेही तितक्याच प्रामाणिकपणे आणि निर्धाराने निभावत राहणार आहे." योगेश कदम यांनी ट्वीटच्या शेवटी आत्मविश्वासाने म्हटलं की,“ छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही.

Comments
Add Comment

Dadar Tree Collapse : दादरमध्ये भलंमोठं झाड कोसळलं! प्लाझाजवळ पार्क केलेल्या कारचा चक्काचूर; अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये गेल्या

BMC Park : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! महापालिकेची सर्व उद्याने उद्या बंद राहणार; जोरदार वारे आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा! २९१ ठिकाणी झाडे कोसळली, २२ ठिकाणी भिंती-घरांचे नुकसान; पुढील २४ तास अतिवृष्टीचा इशारा

मुंबईत सोमवारी (६ जुलै) दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली असून शहरातील जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

Girish Mahajan : अतिवृष्टीमुळे घडलेल्या सर्व घटनांची चौकशी होणार, नागरिकांनी सतर्क राहावे : मंत्री गिरीष महाजन

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार आणि अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि इमारतींचे

Mumbai heavy rain : मुंबईत अवघ्या सहा दिवसांत १० जणांचा मृत्यू; पाऊस, झाडे कोसळणे आणि घर दुर्घटनांनी वाढवली चिंता

मुंबई : यंदाच्या मान्सूनमध्ये मुंबईत पावसामुळे घडणाऱ्या दुर्घटनांचे प्रमाण वाढत असून, ३० जून ते ५ जुलै या अवघ्या

Mumbai Rain Alert : गरज असेल तरच घराबाहेर पडा!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; दुपारनंतर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता मुंबई : "गेल्या काही तासांपासून