शहरात दिवाळीपूर्वी खाद्यपदार्थ व्यावसायिकांवर करडी नजर

विरार (प्रतिनिधी) : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त मिठाई तयार करणाऱ्या व्यावसायिकांवर नजर ठेवण्यासाठी वसई - विरारमधील अन्न आणि औषध प्रशासन सज्ज झाले आहे. नालासोपारा परिसरात गुरुवारी धाडसत्र राबवित कारवाई करण्यात आली आहे.


दिवाळी या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर मिठाईची खरेदी करण्यात येते. याच धर्तीवर मिठाईमध्ये भेसळ करणारे दरवर्षी मिठाई मध्ये भेसळ करण्यासाठी सक्रिय होतात. यासाठी दरवर्षी अन्न व औषध प्रशासन भेसळयुक्त मावा, भेसळयुक्त दुधावर, मिठाईवर कारवाई करत असते. मागील वर्षी देखील ही मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली होती. यंदाही या कारवाईस पालघर जिल्ह्यातील अन्न व औषध विभाग सज्ज झाले आहे. यासाठी विशेष मोहीम हाती घेत खवा, मावा विक्रेते आणि पुरवठा करणाऱ्या ठिकाणी तसेच मिठाई च्या दुकानात, मावा तयार करण्याच्या ठिकणी छापे टाकत तपासणी हाती घेण्यात आली आहे. यामध्ये भेसळयुक्त काही पदार्थ आहेत कि नाही हे तपासण्यासाठी खाद्यतेल, बेसन, खवा, मावा, मिठाई, बर्फी, फरसाण या खाद्यपदार्थांचे नमुने घेत ते तपासणी साठी देण्यात येत आहेत.


दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आम्ही भेसळयुक्त पदार्थ रोखण्यासाठी तपासणी करत आहोत असे अन्न सुरक्षा अधिकारी गोपाळ महावरे यांनी सांगितले. ग्राहकांनी नामांकित दुकानातूनच मिठाई खऱेदी करावी असेही आवाहन त्यांनी केले आहे.दरम्यान, नालासोपारा पश्चिमेकडील यशवंत गौरव येथील एका मॉलमध्ये स्मार्ट सहकारी भांडार नावाचे दुकान आहे. एका ग्राहकाने या भांडारातून विकत घेतेलल्या चॉकलेटला बुरशी लागल्याचे आढळले होते. याबाबत त्याने अन्न् व औषध प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानुसार बुधवारी या मॉल मधील स्मार्ट सहकारी भांडारात छापा टाकला. या कारवाईत बुरशीयुक्त चॉकलेट, ज्युस आणि अन्य पदार्थ जप्त कऱण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने परिसरातील अन्य दुकानातही छापे टाकून नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.

Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक