इमारतीवरून वीट कोसळून तरुणीचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : जोगेश्वरी पूर्वेत मजासवाडी परिसरात बुधवारी सकाळच्या सुमारास कामासाठी जात असलेल्या २२ वर्षीय तरुणीच्या डोक्यावर उंच इमारतीवरून सिमेंट ब्लॉक पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर, स्थानिकांनी धावाधाव करत महिलेला रिक्षातून रुग्णालयात नेले, मात्र उंचीवरून वीट पडल्याने मोठा रक्तश्राव झाल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता.


येथील इमारतीचा बांधकाम सुरू होता, याच बांधकाम इमारतीमधून पांढऱ्या रंगाचा सिमेंट ब्लॉक पडून संस्कृतीचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळतच मेघवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीचे शवविच्छेदन करण्यासाठी पार्थिव रुग्णालयात पाठवले आहे. दरम्यान, घटना कशामुळे घडली, यामध्ये चूक कोणाची आहे, या संदर्भात मेघवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मृत मुलीचे वडील अनिल उमेश अमिन यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य