बुद्धीला चालना


जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


आपण घेतलेल्या विषयांपैकी परमेश्वर हा विषय, मुख्य आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, मानवी जीवनांत ज्या सगळ्या समस्या, प्रश्न, अडचणी, आपत्ती जे काही अनिष्ट आहे ते निर्माण होण्याचे मुख्य कारण देवाबद्दलचे, परमेश्वराबद्दलचे अज्ञान हे आहे. हे माझे विधान काही नास्तिक लोकांना पटणार नाही. मात्र प्रत्यक्षात देव मानणे व न मानणे याचा वस्तुस्थितीशी काहीही संबंध नाही. मृगजळ हे पाहिल्यावर हरीण धावत सुटते. त्याला वाटते की तिथे पाणी आहे. हरणाची जी अवस्था आहे तीच आज माणसाची अवस्था आहे. हरणाला तिथे पाणी नाही हे कळत नाही तसे माणसाचे झालेले आहे. तिथे पाणी नाही हे जर माणसाकडेसुद्धा बुद्धी असेल तरच त्याला कळेल. नास्तिक लोकांना मुळात देव म्हणजे काय हे माहीत नाही, देवाचे रूप काय, देवाचे स्वरूप काय हे माहीत नाही तरीही ते देव नाही म्हणतात. कारण देव नाही हे म्हणणे सोपे जाते. बहुतांशी जे “आम्ही देव मानतो’’ असे म्हणतात त्यांनाही देव माहीत नसतो व कळलेलाही नसतो. मग उमजणे तर दूरच.


देव मानतो किंवा देव मानत नाही यापेक्षा आमचे म्हणणे वेगळेच आहे. देव आहे किंवा नाही हा चर्चेचा अथवा वादाचा विषयच नाही. ज्या गोष्टी आपल्या अनुभवाला येतात त्या नाही कशा म्हणायच्या? असे असतानासुद्धा ज्या गोष्टी कुणालाही अनुभवता येतील पण अनुभव घ्यायचाच नसेल तर त्याला कोण काय करणार? देव आहे की नाही हा मानण्याचा विषय नाही, तो कल्पनेचा विषय नाही तर तो अनुभवण्याचा विषय आहे.


अनुभवाचिये जोगे नोहे बोला ऐसे’’


हवा हा अनुभवण्याचा विषय आहे. हवा दाखव म्हटले किंवा हवा चाखायची आहे म्हटली तर कशी चाखणार? हवा ऐकायची आहे म्हटले तर कशी ऐकणार? हवा आहे की नाही हे नाक व तोंड दाब मग तुला कळेल. तसेच देवाच्या बाबतीत आहे. वस्तुस्थिती नाकारायची किंवा स्वीकारायची, माणसाने पाहिजेत ते करावे पण वस्तुस्तिथी ही मात्र तशीच राहते. मृगजवळच्या ठिकाणी पाणी नसते पण हरणाला ते पाणी आहे असे वाटत असते. तसे जगात परमेश्वर दिसत नाही म्हणून तो नाही असे म्हणता येणार नाही. ज्याच्याजवळ बुद्धी आहे, जो बुद्धीला चालना देतो, त्याच्याजवळ विचार करण्याची शक्ती आहे तो तसा विचार करणार नाही. त्याला परमेश्वराचे रूप व स्वरूप आकळण्याची शक्ती येते.


Comments
Add Comment

मोक्षाची अनुभूती

ऋतुराज-ऋतुजा केळकर “क्षणिक सुखासाठी अपुल्या कुणी होतो नीतीभ्रष्ट कुणी त्यागी जीवन अपुले दु:खं जागी करण्या

विचारांचे सामर्थ्य

जीवन संगीत-सद्गुरू वामनराव पै   तुम्ही कुठेही जा तुमच्या जीवनात तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. १. विचार २. जीभ ३.

जीवनाचे मूल्यमापन

आत्मज्ञान-प्राची परचुरे-वैद्य     मानवी जीवन हे केवळ घटनांची मालिका नसून, अनुभवांची, निवडींची, मूल्यांची आणि

कनकन किंडी

भारतीय ऋषी-डॉ. अनुराधा कुलकर्णी कर्नाटकातील एक आचार्य व्यासराय यांचा शिष्यपरिवार खूपच मोठा होता.

क्रियमाण

जीवन संगीत-सद्गुरू वामनराव पै   क्रियमाण म्हणजे नेमके काय? असा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात असणार. याचे अगदी

घे जवळी, घे जवळी...

ऋतुराज-ऋतुजा केळकर   “मैने बिगाडा हर काम अपना तुने सावरा हर काम मेरा सांचा नाम तेरा...” साजवेळी हे गीत सहजच ओठी