बुद्धीला चालना


जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


आपण घेतलेल्या विषयांपैकी परमेश्वर हा विषय, मुख्य आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, मानवी जीवनांत ज्या सगळ्या समस्या, प्रश्न, अडचणी, आपत्ती जे काही अनिष्ट आहे ते निर्माण होण्याचे मुख्य कारण देवाबद्दलचे, परमेश्वराबद्दलचे अज्ञान हे आहे. हे माझे विधान काही नास्तिक लोकांना पटणार नाही. मात्र प्रत्यक्षात देव मानणे व न मानणे याचा वस्तुस्थितीशी काहीही संबंध नाही. मृगजळ हे पाहिल्यावर हरीण धावत सुटते. त्याला वाटते की तिथे पाणी आहे. हरणाची जी अवस्था आहे तीच आज माणसाची अवस्था आहे. हरणाला तिथे पाणी नाही हे कळत नाही तसे माणसाचे झालेले आहे. तिथे पाणी नाही हे जर माणसाकडेसुद्धा बुद्धी असेल तरच त्याला कळेल. नास्तिक लोकांना मुळात देव म्हणजे काय हे माहीत नाही, देवाचे रूप काय, देवाचे स्वरूप काय हे माहीत नाही तरीही ते देव नाही म्हणतात. कारण देव नाही हे म्हणणे सोपे जाते. बहुतांशी जे “आम्ही देव मानतो’’ असे म्हणतात त्यांनाही देव माहीत नसतो व कळलेलाही नसतो. मग उमजणे तर दूरच.


देव मानतो किंवा देव मानत नाही यापेक्षा आमचे म्हणणे वेगळेच आहे. देव आहे किंवा नाही हा चर्चेचा अथवा वादाचा विषयच नाही. ज्या गोष्टी आपल्या अनुभवाला येतात त्या नाही कशा म्हणायच्या? असे असतानासुद्धा ज्या गोष्टी कुणालाही अनुभवता येतील पण अनुभव घ्यायचाच नसेल तर त्याला कोण काय करणार? देव आहे की नाही हा मानण्याचा विषय नाही, तो कल्पनेचा विषय नाही तर तो अनुभवण्याचा विषय आहे.


अनुभवाचिये जोगे नोहे बोला ऐसे’’


हवा हा अनुभवण्याचा विषय आहे. हवा दाखव म्हटले किंवा हवा चाखायची आहे म्हटली तर कशी चाखणार? हवा ऐकायची आहे म्हटले तर कशी ऐकणार? हवा आहे की नाही हे नाक व तोंड दाब मग तुला कळेल. तसेच देवाच्या बाबतीत आहे. वस्तुस्थिती नाकारायची किंवा स्वीकारायची, माणसाने पाहिजेत ते करावे पण वस्तुस्तिथी ही मात्र तशीच राहते. मृगजवळच्या ठिकाणी पाणी नसते पण हरणाला ते पाणी आहे असे वाटत असते. तसे जगात परमेश्वर दिसत नाही म्हणून तो नाही असे म्हणता येणार नाही. ज्याच्याजवळ बुद्धी आहे, जो बुद्धीला चालना देतो, त्याच्याजवळ विचार करण्याची शक्ती आहे तो तसा विचार करणार नाही. त्याला परमेश्वराचे रूप व स्वरूप आकळण्याची शक्ती येते.


Comments
Add Comment

ज्ञानाचे मर्म

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै  सगळ्या ठिकाणी ज्ञान हे कार्य करते व त्याच्याच वापरांतून प्रयोगांतून मिळणारे

चित्ताची एकाग्रता

आत्मज्ञान : प्राची परचुरे - वैद्य आजच्या तंत्रज्ञानप्रधान धावपळीच्या युगात माणसाचे चित्त खूपच अस्थिर झाले आहे.

महर्षी भारद्वाज

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी आपल्या देदिप्यमान तेजाने आसमंतात अखंड झळकणाऱ्या सप्तर्षींपैकी एक ऋषी म्हणजे

माँ नर्मदा... एक अध्यात्मिक परिक्रमा!!

मनाचा गाभारा : अर्चना सरोदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे!! आजच्या भागात आपण नर्मदा परिक्रमा कोणकोणत्या

उत्पन्ना एकादशीचे महत्त्व आणि पाळा हे नियम! जाणून घ्या सविस्तर...

दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास आणि व्रत केले जाते. प्रत्येक एकादशीला विशिष्ट असे

कधी आहे कालभैरव जयंती? महत्त्व काय? जाणून घ्या सविस्तर

दरवर्षी, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या भगवान कालभैरव