लहान मुलांसाठी सनस्क्रीन वापरावे का ? कशी घ्याल त्यांच्या नाजूक त्वचेची काळजी!

मुंबई : लहान मुलांची काळजी घेणं असं प्रत्येक पालकांना वाटतं. ऋतूनुसार लहान मुलांच्या त्वचेसाठी काय गरजेचं आहे आणि काय नाही असा प्रश्न नेहमीच पालकांना उपस्थित होत असतो. मात्र, बाजारात आता लहान मुलांसाठी सुद्धा बऱ्याच प्रकारच्या क्रीम किंवा मॉइश्चुरायझर आपल्याला पाहायला मिळतं. डॉक्टरांचा सल्ला घेऊन प्रत्येक पालक आपल्या बालकाची योग्य ती काळजी घेत असतात. प्रौढांसाठी सनस्क्रीन वापरणे हे आता सर्वसामान्य झाले आहे, पण लहान मुलांसाठी सनस्क्रीन आवश्यक आहे का? आणि ते त्यांच्या नाजूक त्वचेसाठी सुरक्षित आहे का? हा प्रश्न अनेक पालकांना पडतो.


त्वचारोगतज्ञांच्या मते, मुलांची त्वचा अतिशय कोमल आणि संवेदनशील असते. त्यामुळे सूर्याच्या हानिकारक UVA आणि UVB किरणांचा त्यावर लगेच परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, प्रौढांप्रमाणेच लहान मुलांनीही सनस्क्रीन वापरणे गरजेचे आहे.


एफडीएनुसार, सहा महिन्यांपेक्षा मोठ्या मुलांसाठी सनस्क्रीन वापरणे सुरक्षित आहे. त्यामुळे सहा महिन्यांनंतर पालकांनी मुलांच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी योग्य सनस्क्रीन वापरावे.


मुलांसाठी सनस्क्रीन निवडताना काय लक्षात घ्यावे?


ब्रॉड स्पेक्ट्रम असलेले सनस्क्रीन निवडा, जे UVA आणि UVB दोन्ही किरणांपासून संरक्षण करते.


SPF १५ ते ३० असलेले सनस्क्रीन मुलांसाठी पुरेसे असते.


ऑक्सिबेन्झोनसारखी रसायने असलेले उत्पादने टाळावीत, कारण ती डोळ्यांना त्रास देऊ शकतात.


सनस्क्रीन व्यतिरिक्त इतर उपाय काय करावेत?
उन्हाळ्यात मुलांना थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवणे, टोपी घालणे आणि अंग झाकणारे हलके कपडे परिधान करणे फायदेशीर ठरते.


मुलांची त्वचा अधिक संवेदनशील असल्याने त्यांची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे. योग्य सनस्क्रीन आणि योग्य सवयींमुळे त्यांना उन्हापासून चांगले संरक्षण मिळू शकते.


(टीप : वरील सर्व बाबी प्रहार केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. ही माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. यातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी प्रहार घेत नाही आणि कोणताही दावा करत नाही.)

Comments
Add Comment

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे

मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकरांची लाखोंची फसवणूक; नक्की घडलं तरी काय ?

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्ष उसगावकर यांची लाखोंची फसवणूक झाल्याची बातमी समोर आली आहे.

नागपूरचे जिल्हाधिकारी आता नागपूर महापालिकेचे आयुक्त

मुंबई : नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. नागपूर

लक्षवेधींची संख्या कमी केल्याने सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून नाराजी

गटनेत्यांची बैठक घेणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आश्वासन मुंबई : राज्य विधिमंडळाच्या