विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक


नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली. सिरपमध्ये शरीराला अपायकारक घटक मिसळण्यात आले. हे औषध ज्या चिमुरड्यांना देण्यात आले त्यांची तब्येत बिघडल्याच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली. तब्येत खालावली आणि मध्य प्रदेशमधील २३ बालकांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची सरकारी पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली आहे. इथून पुढे कोणत्याही कफ सिरपची प्रत्येक बॅच तयार करण्याआधी त्याची चाचणी घेण्याचे बंधन सरकारने घातले आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात कोल्ड्रिफ कफ सिरपची विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच औषध विक्रेत्यांना कोल्ड्रिफचा साठा असल्यास कंपनीकडे परत पाठवून द्या, असे आदेश दिले आहेत.


विषारी कफ सिरप प्रकरणी श्रीसन फार्माचे संचालक गोविंदन रंगनाथन यांना अटक करण्यात आली आहे. रंगनाथन गोविंदन हे चेन्नई येथील घर आणि कांचीपुरम येथील कारखान्याला कुलुप लावून पत्नीसोबत फरार झाले होते. मध्य प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने दोन दिवस तामिळनाडूतील चेन्नईत ठिकठिकाणी धाडी टाकल्या. पोलिसांनी रंगनाथन गोविंदन यांच्यावर 20 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. अखेर गोविंदन रंगनाथन यांना अटक करण्यात आली.


याआधी पाच ऑक्टोबर २०२५ रोजी छिंदवाडातील परासिया पोलीस ठाण्यात औषध निर्माता कंपनी श्रीसन फार्माचे संचालक मंडळ, बालरोजतज्ज्ञ डॉक्टर प्रवीण सोनी आणि इतर जबाबदार व्यक्तींविरोधात कलम १०५ आणि २७६ तसेच ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट १९४० अंतर्गत कलम २७ अ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


सिरप नॉन-फार्मास्युटिकल ग्रेड केमिकल्सपासून बनवल्यामुळेच मध्य प्रदेशमध्ये अनेक चिमुरड्यांना त्रास झाला. या प्रकरणात पोलिसांनी बालरोजतज्ज्ञ डॉक्टर प्रवीण सोनी आणि श्रीसन फार्माचे संचालक गोविंदन रंगनाथन यांना अटक केली आहे. छिंदवाडा पोलीस अधीक्षक अजय पांडे यांच्या नेतृत्वातील विशेष तपास पथकाने धडक कारवाई केली.


Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव