नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज उद्घाटन

लंडनस्थित झहा अदीद या वास्तूविशारद कंपनीने केलंय डिझाइन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या विमानतळाची एक वेगळीच झलक नागरिकांना पाहायला मिळणार असून, त्याची वास्तुकला सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या विमानतळाचे डिझाईन लंडनस्थित झहा अदीद या वास्तुविशारद कंपनीने केले आहे. भारतीय संस्कृतीपासून प्रेरित होऊन आणि राष्ट्रीय फुल असलेल्या कमळाच्या संकल्पनेवर आधारित 'तरंगणारे कमळ' हे विमानतळाचे केंद्रबिंदू आहे.

खरं तर मुंबई महानगरातील दुसरं मोठं हे विमानतळ ठरणार आहे. या विमानतळामुळे या परिसरातील आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणात गती मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१८ मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी करण्यात आली होती. तेव्हापासून या विमानतळाच्या प्रकल्पाचं काम सुरु होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केली होती.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११ ऑक्टोबर २०२४ रोजी हवाईदलाचे सी-२९५ आणि सुखोई या दोन विमानाचं यशस्वी लँडिंग करण्यात आलं होतं. या यशस्वी चाचण्यांनंतर आता या विमानतळाचं उद्घाटन पार पडत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे.नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड आणि सिडको यांच्या संयुक्त भागीदारीत या विमानतळाचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आदी दिग्गज नेते या उद्घाटनासाठी उपस्थित असणार आहेत.

विमानतळाच्या काही खास वैशिष्ट्यांचा आढावा

विमानतळाचे उद्घाटन ८ ऑक्टोबरला होणार असले, तरी पहिले विमान डिसेंबर महिन्यात उड्डाण घेणार आहे. पहिल्या उड्डाणासाठी एअर इंडिया, इंडिगो किंवा अकासा एअर यापैकी कोणते विमान असेल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. या विमानतळाला चार मुख्य प्रवेशद्वार आणि तीन केंद्रे आहेत. अल्फा, ब्रावो आणि चार्ली. त्याचबरोबर, एकूण ८८ चेक-इन काऊंटर असून, यापैकी ६६ काऊंटरवर कर्मचाऱ्यांनद्वारे चेक-इन केले जाईल, तर २२ काऊंटरवर सेल्फ चेक-इनची सुविधा असेल. सुरुवातीच्या काळात विमानसेवा सकाळी ८ ते संध्याकाळी ८ या वेळेतच सुरू राहील. विमानतळाची पूर्ण क्षमता ४० एटीएम इतकी असली तरी प्रारंभी फक्त १० एटीएम वर ऑपरेशन सुरू होईल, म्हणजे तासाला दहा विमानांची उड्डाणे किंवा लँडींग होऊ शकतील.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रवासी सोयी

- पाऊस किंवा धुक्याच्या काळात सुरक्षित लँडिंगसाठी अत्याधुनिक नॅव्हिगेशन आणि सेफ्टी सिस्टम्स बसवण्यात आल्या आहेत.
- डिजी यात्रा तंत्रज्ञान लागू करण्यात आले असून, यामुळे प्रवाशांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही.
- पारंपरिक फूड कोर्टऐवजी येथे फूड हॉल संकल्पना आणण्यात आली आहे, जिथे प्रवासी विविध स्टॉल्सवरून एकत्रित ऑर्डर देऊन जेवण मिळवू शकतील.
- विमानतळ परिसरात भारतीय कलावैभवाचे दर्शन घडवणाऱ्या डिजिटल इंस्टॉलेशन्स, फॅब्रिक फॉरेस्ट, आणि धाग्यांच्या कलाकृतींनी सजावट करण्यात येणार आहे.

दि.बा.पाटील यांचं नाव?

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची मागणी करण्यात आलेली आहे.त्या पार्श्वभीवर या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची ग्वाही सरकारने दिलेली आहे. खरं तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबईच्या विकासाला गती तर मिळणार आहे. तसेच हजारो रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.
Comments
Add Comment

किनारी रस्ता प्रकल्पात पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्याचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी

महापालिकेच्या टाऊनहॉल जिमखान्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा भवनाच्या जागेवर

कुलाबा सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया ३ दशलक्ष लिटर पाण्याची होणार विक्री

मुंबई: कुलाबा मल जल प्रक्रिया केंद्रात प्रकल्पातून पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी प्राप्त होणाऱ्या १० दशलक्ष

मिठी नदीच्या कामाला येत्या १ एप्रिलपासून होणार सुरुवात

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आतापर्यंत कंपन्याच

मुंबईत आतापर्यंत सुमारे ८८ टक्के मालमत्ता कर वसुली

मुंबई: मंगळवार २४ मार्च २०२६ पर्यंत एकूण ६ हजार ४४९ कोटी रुपये म्हणजेच निर्धारित उद्दिष्टाच्या ८७.८६ टक्के इतका