घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेचा पुढाकार, 'या' केंद्राची केली स्थापना

मुंबई (खास प्रतिनिधी) : वैवाहिक जीवनासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने नुकत्याच एका विवाहपूर्व समुपदेशन केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका आणि भारतीय स्त्री शक्ती या संस्थेच्या माध्यमातून विलेपार्ले येथे 'तेरे मेरे सपने’ हे 'विवाहपूर्व समुपदेशन केंद्र' सुरू झाले आहे.


या समुपदेशन केंद्रात जोडप्यांना विवाहपूर्व संवाद कौशल्य, ताणतणाव व्यवस्थापन, नातेसंबंधातील समन्वय यासारख्या बाबींसाठी मार्गदर्शन मिळणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शहरी उपजीविका केंद्र अंतर्गत या विवाहपूर्व संवाद केंद्राचा शुभारंभ विलेपार्ले येथील बाबासाहेब गावडे रुग्णालयाच्या इमारतीत करण्यात आला आहे.


'विवाहपूर्व समुपदेशन –  आजची गरज' या विषयावर परिसंवादाचे आयोजनही या निमित्ताने करण्यात आले होते. या कार्यक्रमातील वक्त्या, कौटुंबिक न्यायालयाच्या निवृत्त प्रमुख सल्लागार डॉ. सुवर्णा भुजबळ यांनी विवाहपूर्व समुपदेशनाचे महत्त्व अधोरेखित केले. सुदृढ संवाद, भावनिक समतोल आणि परस्परांचा आदर हे वैवाहिक आयुष्य टिकवणारे खरे आधारस्तंभ आहेत. यासाठी विवाहपूर्व समुपदेशन अत्यंत गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले. या परिसंवादासाठी कौटुंबिक न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती डॉ. सुनंदा जोशी यांचीही विशेष उपस्थिती होती. परस्परांविषयी प्रेम, विश्वास आणि आदर ही सुदृढ नात्यांची मूलभूत तत्वे आहेत, असे मत डॉ. सुनंदा जोशी यांनी परिसंवादादरम्यान मांडले.


भारतीय स्त्री शक्ती संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा वर्षा पवार – तावडे, संस्थेच्या मुंबई अध्यक्षा डॉ. प्राची मोघे, स्त्री शक्ती संस्थेच्या मनीषा चव्हाण हे मान्यवरही यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रणिती मशानकर यांनी केले.

Comments
Add Comment

सायन प्रतीक्षा नगर येथील चार इमारती अतिधोकादायक घोषित

सायन प्रतीक्षानगर येथील म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील चार इमारती

मुंबईतील ३८८ म्हाडा पुनर्रचित इमारतींचा पुनर्विकास समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून होणार

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या

महापालिका शाळांमधील मुलांचे व्याकरण होणार अधिक मजबूत

इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांना देणार व्याकरणाची पुस्तके मुंबई (खास प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे भाषेच्या

मुंबई–वाढवण प्रवासाला नवे पंख; कसा असेल वाढवण बंदराशी जोडणारा उन्नत पूल?

मुंबई : मुंबई ते वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दक्षिण

बिबट्याच्या दहशतीवर उपाययोजना करण्याची मागणी

मुंबई: ग्रामीण महाराष्ट्रातील बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना

पद्मभूषण सन्मानित धर्मेंद्र यांना शासकीय अंत्यसंस्कार नाहीत; खरे कारण समोर

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले