मोठी बातमी: भारत आरबीआयच्या पाठिंब्याने भारताची डिजिटल करन्सी सादर करणार

नवी दिल्ली:केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मोठी घोषणा केली आहे. भारत लवकरच आर्थिक व्यवहार सुलभ करण्यासाठी आणि कागदाचा वापर कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे समर्थित डिजिटल चलन सादर करणार आहे असे केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले आहेत. आरबीआयच्या पाठिंब्यासह आरबीआय डिजिटल चलन (RBI Digital Currency) पारंपारिक बँकिंग प्रणालींना जलद, सुरक्षित आणि शोधण्यायोग्य पर्याय उपलब्ध करण्यासाठी बँकेच्या व सरकारच्या वतीने हे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. हा उपक्रम सरकारच्या व्यापक डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. या चलनामुळे नियामक देखरेख (Regulators Observations) राखताना सुरक्षित आणि पारदर्शक व्यवहार सुनिश्चित करतो.


क्रिप्टोकरन्सींबद्दल सरकारची भूमिका-


गोयल म्हणाले की भारत सार्वभौम किंवा मालमत्ता पाठिंब्याशिवाय क्रिप्टोकरन्सींना प्रोत्साहन देत नाही जसे की आरबीआय किंवा मान्यताप्राप्त राष्ट्रीय चलन समर्थित नाही. त्यांनी स्पष्ट केले की अशा खाजगी डिजिटल मालमत्तेवर पूर्ण बंदी नसली तरी, सट्टेबाजीच्या गुंतवणुकीला परावृत्त करण्यासाठी आणि संस्थात्मक पाठिंब्याच्या अभावामुळे ग्राहकांना संभाव्य नुकसानापासून वाचवण्यासाठी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कर आकारला जातो.'भारताला कोणीही अशा क्रिप्टोकरन्सीमध्ये अडकून पडावे असे वाटत नाही ज्याला कोणताही आधार नाही आणि कोणतीही जबाबदारी नाही' गोयल यांनी भर दिला, वित्तीय व्यवस्थेतील स्थिरता आणि गुंतवणूकदारांच्या संरक्षणावर सरकारचे लक्ष अधोरेखित केले आहे.याशिवाय कतारसोबत द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार अ सल्याचे सांगत दोहा भेटीदरम्यान, गोयल यांनी भारत आणि कतारमधील द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्याच्या प्रयत्नांची घोषणाही केली आहे. त्यांनी सांगितले की भारत-कतार मुक्त व्यापार करार (FTA) आर्थिक वर्ष २०२६ च्या मध्यापर्यंत किंवा अखे रीस अंतिम केला जाऊ शकतो. कतार हा गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) मध्ये भारताच्या प्रमुख व्यापारी भागीदारांपैकी एक आहे, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये द्विपक्षीय व्यापार १४.१५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे.


भारताचे आधीच युएई सोबत व्यापार करार आहेत आणि लवकरच ओमानसोबतही असाच करार होण्याची अपेक्षा सध्या उद्योगविश्वात व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

'प्रहार' Stock Market: अखेर पाचव्या दिवशी मात्र घसरण चार दिवसांच्या रॅलीला ब्रेक बाजारात मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग सुरू

मोहित सोमण:सलग चार वेळा शेअर बाजारात झालेल्या वाढीनंतर आज अखेर इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात ब्रेक लागला आहे.

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ

मुंबई : राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण

ITI Share Surge: १४% उसळी घेतलेला ITI Ltd शेअर नक्की आहे काय? कुठल्या कारणामुळे शेअर All time High जाणून घ्या

मोहित सोमण:भारत सरकारच्या उपक्रमांअंतर्गत (Government of India Undertaking)असलेली छोटी कंपनी आयटीआय लिमिटेड कंपनीच्या शेअरने आज

मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले. मोदींनी बटण

RBI FX Retail Bharat Connect Linkage: आता एका अँपमधील क्लिकवर रूपयांच्या बदल्यात अमेरिकन डॉलर खरेदी करणे शक्य आरबीआयचे मोठे पाऊल!

प्रतिनिधी:एफएक्स-रिटेल-भारत कनेक्ट लिंकेजमुळे सहभागी बँकांमध्ये बँक खाते असलेल्या वैयक्तिक ग्राहकांना सहभागी

शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाची पुढील 'सर्वोच्च' सुनावणी १२ नोव्हेंबरला होणार

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्ष म्हणजेच शिवसेना असा निर्णय