बाणगंगा दीपोत्सवासाठी ४० लाखांचा खर्च! महापालिकेकडून २ कंत्राटदारांची नियुक्ती

मुंबई : बाणगंगा तलाव परिसरात त्रिपुरा पौर्णिमेला दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. कार्तिक महिन्यात येणाऱ्या या दिपोत्सवाचा खर्च तब्बल ४० लाख ४० हजार रुपये इतका होणार आहे. यासाठी दोन कंत्राटदारांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.


मुंबईतील ऐतिहासिक पर्यटन स्थळांपैकी असलेले बाणगंगा तलाव हे हिंदूंचे महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. महाराष्ट्र प्राचीन स्मारके, पुराणवास्तूशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६० अन्वये हा तलाव राज्य सरकारने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे. या तलावाभोवती मंदिरे, समाधी, धर्मशाळा, मठ असून हे स्थान राष्ट्रीय महत्त्व असलेले सांस्कृतिक केंद्र आहे. तलावाला लागूनच व्यंकटेश बालाजी मंदिर, सिद्धेश्वर शंकर मंदिर, राम मंदिर व वाळूकेश्वर मंदिर प्रसिद्ध मंदिरे आहेत.


पुरातन काळापासून बाणगंगा तलावास धार्मिक व सांस्कृतिक महत्व असल्याने या ठिकाणी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. या तलावाला मुंबई भेटीवर असलेले अनेक पर्यटक आवर्जून भेट देतात. या ऐतिहासिक तलाव परिसरात दरवर्षी त्रिपुरा पौर्णिमेला मोठा दीपोत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही या ठिकाणी कार्तिक पौर्णिमेला दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यात परिसरात विद्युत रोषणाई, फुलांची सजावट, छायाचित्रीकरण, चलचित्रीकरण व व्हिडिओग्राफी, तीन स्क्रीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याशिवाय स्टेज मंडप व खुर्च्यांची व्यवस्थाही केली जाणार आहे. ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक, बॅनर लावले जाणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. या व्यवस्थेसाठी दोन कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येणार असून यासाठी सुमारे ४० लाख ४० हजार रुपये खर्च अपेक्षित असल्याचेही पालिकेकडून सांगण्यात आले.


‘ब’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून मान्यता


बाणगंगा तलावाला हजारो देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. या तलावाचे ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक व प्राचीनकालीन महत्व लक्षात घेऊन, राज्य सरकारने १५ नोव्हेंबर २०२२ मध्ये बाणगंगा तलाव (मलबार हिल, मुंबई) परिसर क्षेत्रास ब वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यास मान्यता दिली.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य