गुरुवारी राज्यातील ओला, उबर सेवा बंद

कॅब-रिक्षाचालक जाणार संपावर


मुंबई (प्रतिनिधी) : परिवहन विभागाच्या गलथान कारभाराकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी तसेच कॅब, रिक्षा व टॅक्सीचालक यांच्या मागण्यांची अंमलबजावणी न झाल्याने गुरुवारी (दि.९) प्रवासी सेवा एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय भारतीय गिग कामगार मंचने घेतला आहे. मंच अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी ही माहिती दिली.


डॉ. केशव क्षीरसागर म्हणाले, परिवहन विभागाच्या गैरकारभाराविरोधात कॅब, रिक्षा व टॅक्सी चालकांचे १५ जुलै २०२५ पासून उपोषण, निदर्शने, सेवा बंद अशा विविध पद्धतीने आंदोलने सुरू आहेत. ओला, उबर, रॅपिडो या तीनही कंपन्या सरकारी नियमांना पायदळी तुडवून बेकायदेशीरपणे राज्यात काम करत आहेत. एफआयआर दाखल केल्यानंतरही काम करत आहेत. खासगी दुचाकीवरून प्रवासी सेवा सुरूच आहे. ३० सप्टेंबरला आझाद मैदानात केलेल्या आंदोलनावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट नाकारली. त्यामुळे आंदोलक सरनाईक यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी जात असताना त्यांना आझाद मैदान पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले. त्यांना यलो गेट पोलीस ठाण्यात आणले.


त्यानंतर मुख्यमंत्री यांचे सचिव विद्याधर महाले यांनी आंदोलक व परिवहन विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत मंत्रालयात बैठक घेऊन त्यावर तोडगा काढू, असे निर्देश सहाय्यक आयुक्त भरत कळस्कर यांना दिले होते. परंतु त्यानंतर कार्यवाही झाली नाही. गेले ६ दिवस यावर कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे बंदचा निर्णय गिगने घेतला आहे.


मुंबईत सुमारे साडेसात लाख, त्या खालोखाल पुण्यात ३ लाख, तर नागपूर व नाशिकमध्ये प्रत्येकी २ लाख असे कॅब, टॅक्सी व रिक्षाचालक आहेत. प्रवासी सेवा बंदमुळे चालकांना त्याचबरोबर प्रवाशांनाही फटका बसणार आहे.

Comments
Add Comment

माजी लोकसभाध्यक्षांना 'ब्रह्मभूषण' पुरस्कार जाहीर

मुंबई : माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री