गुरुवारी राज्यातील ओला, उबर सेवा बंद

कॅब-रिक्षाचालक जाणार संपावर


मुंबई (प्रतिनिधी) : परिवहन विभागाच्या गलथान कारभाराकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी तसेच कॅब, रिक्षा व टॅक्सीचालक यांच्या मागण्यांची अंमलबजावणी न झाल्याने गुरुवारी (दि.९) प्रवासी सेवा एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय भारतीय गिग कामगार मंचने घेतला आहे. मंच अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी ही माहिती दिली.


डॉ. केशव क्षीरसागर म्हणाले, परिवहन विभागाच्या गैरकारभाराविरोधात कॅब, रिक्षा व टॅक्सी चालकांचे १५ जुलै २०२५ पासून उपोषण, निदर्शने, सेवा बंद अशा विविध पद्धतीने आंदोलने सुरू आहेत. ओला, उबर, रॅपिडो या तीनही कंपन्या सरकारी नियमांना पायदळी तुडवून बेकायदेशीरपणे राज्यात काम करत आहेत. एफआयआर दाखल केल्यानंतरही काम करत आहेत. खासगी दुचाकीवरून प्रवासी सेवा सुरूच आहे. ३० सप्टेंबरला आझाद मैदानात केलेल्या आंदोलनावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट नाकारली. त्यामुळे आंदोलक सरनाईक यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी जात असताना त्यांना आझाद मैदान पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले. त्यांना यलो गेट पोलीस ठाण्यात आणले.


त्यानंतर मुख्यमंत्री यांचे सचिव विद्याधर महाले यांनी आंदोलक व परिवहन विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत मंत्रालयात बैठक घेऊन त्यावर तोडगा काढू, असे निर्देश सहाय्यक आयुक्त भरत कळस्कर यांना दिले होते. परंतु त्यानंतर कार्यवाही झाली नाही. गेले ६ दिवस यावर कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे बंदचा निर्णय गिगने घेतला आहे.


मुंबईत सुमारे साडेसात लाख, त्या खालोखाल पुण्यात ३ लाख, तर नागपूर व नाशिकमध्ये प्रत्येकी २ लाख असे कॅब, टॅक्सी व रिक्षाचालक आहेत. प्रवासी सेवा बंदमुळे चालकांना त्याचबरोबर प्रवाशांनाही फटका बसणार आहे.

Comments
Add Comment

अक्षय कुमारमुळे महाराष्ट्रातील पोलिसांच्या गणवेशात बदल होणार ? काय म्हणाले मुख्यमंत्री ?

मुंबई : फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच फिक्की या संस्थेसाठी बॉलिवूड अभिनेता अक्षय

व्हॉट्अ‍ॅपवर नंबर नाही; आता दिसेल ‘युजरनेम’

मुंबई (प्रतिनिधी) : प्रायव्हसीची (गोपनीयतेची) काळजी घेणाऱ्यांसाठी एक मोठी आणि चांगली बातमी आहे. लवकरच व्हॉट्अ‍ॅप

तळोजा एमआयडीसीचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद

डोंबिवली : अंबरनाथ तालुक्यातील जांभुळ जलशुद्धीकरण केंद्र आणि बारवी गुरूत्व वाहिनी देखभाल दुरुस्तीची कामे

मुंबई ते नवी मुंबई विमानतळांदरम्यानचा प्रवास होणार जलद

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील सर्वात मोठी २ विनातळे एकमेकांना जोडली जाणार आहेत. मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंत

ऐरोली ते काटई नाका प्रकल्पाच्या कामाला आणखी सहा महिने लागणार

मुंबई (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली-नवी मुंबई भागातील प्रवास जलद होण्यासाठी आणखी सहा महिने जाणार आहेत. हे अंतर

मेट्रो ९ मार्गिका १५ डिसेंबर पर्यंत, मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा - सरनाईक

मुंबई : ठाणे आणि मीरा-भाईंदर क्षेत्रातील रहिवाशांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मेट्रो ९ मार्गिका १५