फडणवीस सरकारच्या २ सप्टेंबरच्या GR ला स्थगिती देण्याची मागणी कोर्टाने फेटाळली, मराठ्यांना दिलासा


मुंबई : ठोस पुरावे सादर केल्यास त्यांची छाननी करुन खात्री पटल्यानंतर संबंधित मराठा व्यक्तीला कुणबी असल्याचे प्रमाणपत्र द्यावे असा शासन निर्णय अर्थात जीआर फडणवीस सरकारने २ सप्टेंबर २०२५ रोजी जारी केला. हा निर्णय जाहीर होताच मराठा समाजातील अनेकांनी आनंद व्यक्त केला. तर मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाला ओबीसींकडून विरोध सुरू झाला. राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात निवडक ओबीसी संघटनांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. या प्रकरणावर आज म्हणजेच मंगळवार ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्ते आणि राज्य शासन अशा दोन्ही बाजूच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकून मुंबई उच्च न्यायालयाने एक हंगामी आदेश जारी केला. उच्च न्यायालयाने फडणवीस सरकारच्या २ सप्टेंबरच्या जीआरला स्थगिती देण्याची मागणी फेटाळली. उच्च न्यायालयाच्या या हंगामी आदेशामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला तर याचिकाकर्त्यांना धक्का बसला.


हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मंजुरी देणारा शासन निर्णय अर्थात जीआर फडणवीस सरकारने जारी केला आहे. या जीआरला स्थगित देण्याची मागणी मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने फेटाळली. राज्य शासनाने संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय दिला आहे की नाही याचा निर्णय एवढ्या घाईने घेणे अशक्य आहे. सविस्तर युक्तिवादानंतर निर्णय घेणे योग्य होईल, असे सांगत खंडपीठाने तातडीने फडणवीस सरकारच्या जीआरला स्थगिती देण्यास नकार दिला.


Comments
Add Comment

मतदानापूर्वीच राज्यात भाजपच्या बिनविरोध नगरसेवकांचा षट्कार!

कल्याणमध्ये तीन, धुळ्यात दोन, तर पनवेलमध्ये एक विजयी मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपने

मुंबई अग्निशमन दलाकडून २ हजार ७०३ आस्थापनांची तपासणी, १३६ विरोधात कारवाई*

मुंबई : नववर्ष निमित्ताने आयोजित स्वागत सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन

मालाड दिंडोशीतील उबाठाच्या ५उमेदवारांच्या अर्जांवर शिवसेनेचा आक्षेप अर्ज होऊ शकतात बाद?

मुंबई : मुंबईत राज ठाकरेंचा हात हातात आल्यावर हुरळून गेलेल्या उबाठाला आता प्रत्यक्ष प्रचारा आधीच मोठा धक्का

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

‘जर्मन बेकरी’प्रकरणातील आरोपी बंटी जहागिरदार याचा गोळीबारात मृत्यू

श्रीरामपूर : पुण्यातील गाजलेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार

नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे

नवर्षप्रारंभाच्या पूर्वसंध्येला दिल्या शुभेच्छा मुंबई : - नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे,