फडणवीस सरकारच्या २ सप्टेंबरच्या GR ला स्थगिती देण्याची मागणी कोर्टाने फेटाळली, मराठ्यांना दिलासा


मुंबई : ठोस पुरावे सादर केल्यास त्यांची छाननी करुन खात्री पटल्यानंतर संबंधित मराठा व्यक्तीला कुणबी असल्याचे प्रमाणपत्र द्यावे असा शासन निर्णय अर्थात जीआर फडणवीस सरकारने २ सप्टेंबर २०२५ रोजी जारी केला. हा निर्णय जाहीर होताच मराठा समाजातील अनेकांनी आनंद व्यक्त केला. तर मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाला ओबीसींकडून विरोध सुरू झाला. राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात निवडक ओबीसी संघटनांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. या प्रकरणावर आज म्हणजेच मंगळवार ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्ते आणि राज्य शासन अशा दोन्ही बाजूच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकून मुंबई उच्च न्यायालयाने एक हंगामी आदेश जारी केला. उच्च न्यायालयाने फडणवीस सरकारच्या २ सप्टेंबरच्या जीआरला स्थगिती देण्याची मागणी फेटाळली. उच्च न्यायालयाच्या या हंगामी आदेशामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला तर याचिकाकर्त्यांना धक्का बसला.


हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मंजुरी देणारा शासन निर्णय अर्थात जीआर फडणवीस सरकारने जारी केला आहे. या जीआरला स्थगित देण्याची मागणी मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने फेटाळली. राज्य शासनाने संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय दिला आहे की नाही याचा निर्णय एवढ्या घाईने घेणे अशक्य आहे. सविस्तर युक्तिवादानंतर निर्णय घेणे योग्य होईल, असे सांगत खंडपीठाने तातडीने फडणवीस सरकारच्या जीआरला स्थगिती देण्यास नकार दिला.


Comments
Add Comment

Delhi bomb blast case: दहशतवादी डॉक्टरांच्या नेटवर्कचा पर्दाफाश, २० हून अधिक अटक

नवी दिल्ली : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात १० नोव्हेंबरला झालेल्या भयंकर बॉम्बस्फोटानंतर दिल्लीमध्ये

अमित शाहांशी बोलले एकनाथ शिंदे, महायुतीतला संघर्ष टाळण्यासाठी केली चर्चा

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

इंदुरीकर महाराज झाले नेटकऱ्यांच्या टीकेचे धनी

मुंबई : आपल्या खास शैलीत कीर्तन आणि समाजप्रबोधन करणारे इंदुरीकर महाराज आपल्या मुलीच्या साखरपुड्यात केलेल्या

भाजपमधील वाढत्या इनकमिंगमुळे शिवसेनेत अस्वस्थता, एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना

मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. या

मुंबईच्या राम मंदिर स्टेशनवर जन्मलेले बाळ झाले 'नैसर्गिकरित्या बरे'.

मुंबई : राम मंदिर स्टेशनवर जन्मलेल्या बाळाची तब्येत जन्मानंतर काही तासांत खालावली होती. पण वेळेत उपचार

मुंबईतील कुर्ला परिसरात गॅस पाइपलाइन गळतीमुळे लागली आग

मुंबई : कुर्ला पश्चिमे येथील विनोबा भावे नगरमधील एलआयजी कॉलनीच्या मागे असलेल्या मुबारक इमारतीत दुपारी गॅस