पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ८ ऑक्टोबर रोजी अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

या दिवशी होणाऱ्या विमानतळाच्या भव्य उद्घाटन सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात देशभरातून मान्यवर, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. सकाळी ६:१० वाजल्यापासून रात्रीपर्यंत ही बंदी लागू राहील, अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.

पनवेल, रायगड आणि नवी मुंबई परिसरातील नागरिकांना उद्घाटनाच्या दिवशी वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी पर्यायी मार्गांची आखणी केली आहे. अवजड वाहन चालकांनी निर्धारित वेळेत प्रवास टाळावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

वाहतूक पोलिसांनी कार्यक्रमस्थळी आणि आसपासच्या परिसरात विशेष पथके तैनात केली असून, सुरक्षा व शिस्तबद्ध वाहतूक राखण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. नागरिकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
Comments
Add Comment

Pune Porsche Car Accident Case : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात नवा वाद! जामिनावर सुटल्यानंतर अग्रवाल कुटुंबाची जंगी पार्टी, VIDEO व्हायरल

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणाने देशभरात खळबळ उडवून दिली होती.

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे आता सिनेमातून उलगडणार, लवकरच भोंदू खरातचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

Ashok Kharat : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण नाशिकमध्ये समोर आले आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. खरात प्रकरणाने

NEET 2026 Paper Leak : मोटेगावकर अडचणीत; CBIला घरातूनच मिळाला महत्त्वाचा साक्षीदार

नवी दिल्ली : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता आणखी एक मोठा आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

NEET Paper Leak Case : NEET पेपरफुटी रॅकेटचा पर्दाफाश; १० ते १२ लाखांत विकला जात होता पेपर

लातूर : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील धागेदोरे आता लातूरमध्ये अधिकच मजबूत होताना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 143 व्या जयंतीनिमित्त 31 मे रोजी ‘त्रिवेणी’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला

DCM Eknath Shinde : मोदी खरे धुरंदर, त्यांच्यावर टीका करणारे दलिंदर, हर्षवर्धन सकपाळ यांच्या मोदीवरील टीकेला उपमुख्यमंत्री शिंदेंचे प्रत्युत्तर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या बारा वर्षांत देशाचे यशस्वीपणे नेतृत्व करत भारताला विकास,