पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ८ ऑक्टोबर रोजी अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

या दिवशी होणाऱ्या विमानतळाच्या भव्य उद्घाटन सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात देशभरातून मान्यवर, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. सकाळी ६:१० वाजल्यापासून रात्रीपर्यंत ही बंदी लागू राहील, अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.

पनवेल, रायगड आणि नवी मुंबई परिसरातील नागरिकांना उद्घाटनाच्या दिवशी वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी पर्यायी मार्गांची आखणी केली आहे. अवजड वाहन चालकांनी निर्धारित वेळेत प्रवास टाळावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

वाहतूक पोलिसांनी कार्यक्रमस्थळी आणि आसपासच्या परिसरात विशेष पथके तैनात केली असून, सुरक्षा व शिस्तबद्ध वाहतूक राखण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. नागरिकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
Comments
Add Comment

Navale Bridge traffic rule : पुण्यात नवले ब्रिज मार्गावर ४० किमी वेगमर्यादा लागू; पालखी सोहळ्यामुळे RTO चाचण्यांच्या वेळापत्रकातही बदल

पुणे : शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी पुणे वाहतूक विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारती

Dapoli Mahabaleshwar highway : दापोली–पोलादपूर–महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गासाठी प्रवीण दरेकरांची गडकरींकडे मागणी

मुंबई : दापोली–पोलादपूरमार्गे महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी देण्याची मागणी भाजपचे गटनेते तथा आमदार

Police Suicide : मुंबईच्या लोकभवनात SRPF जवानाची आत्महत्या; गार्ड ड्युटीवर असताना सर्व्हिस रायफलमधून झाडली गोळी

मुंबई : मलबार हिल (Malabar Hill) येथील लोकभवन (Lokbhavan) परिसरात सोमवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. राजभवनाच्या सुरक्षेसाठी

Maharashtra school holiday : मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह अनेक जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात