झोप न लागण्याची समस्या? या सवयी बदलतील तुमचं आयुष्य!

मुंबई : खरंतर, हल्लीच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे झोपेच्या समस्या खूपच वाढल्या आहेत. चुकीच्या खाण्याच्या सवयी, असंतुलित दिनचर्या आणि सतत डोक्यात चालणारे विचार यामुळे झोप लागणे कठीण होते. यावर उपाय म्हणून अनेक औषधं आणि थेरपी वापरली जातात, पण काही साध्या आणि नैसर्गिक गोष्टींनीसुद्धा झोपेची गुणवत्ता सुधारता येते.



खाली दिलेले उपाय नियमितपणे केल्यास झोपेसंबंधी असलेल्या अडचणी दूर होऊ शकतात:


झोपण्यापूर्वी आंघोळ करा


रात्री झोपण्याआधी कोमट पाण्याने आंघोळ केल्याने शरीर आणि मन दोन्ही शांत होतात. दिवसभराचा थकवा, मानसिक ताण दूर होतो. केवळ स्वच्छतेसाठीच नव्हे तर शरीरातील उष्णता आणि तणाव कमी करण्यासाठी रात्रीची आंघोळ फायदेशीर ठरते.


जेवल्यानंतर लगेच झोपू नका


रात्रीचं जेवण झोपण्याच्या किमान ३-४ तास आधी करावं. विशेषतः जड अन्न घेतल्यास पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. लगेच झोपल्यास गॅस, अपचन आणि झोपेत अस्वस्थता जाणवू शकते.


दिवसाच्या शेवटी स्वतःशी संवाद


झोपण्याआधी थोडा वेळ स्वतःसोबत घालवा. आजचा दिवस कसा गेला याचा विचार करा. काही चुका झाल्या असतील तर त्या सुधारण्याचा निर्धार करा. आयुष्याचं मोल आणि वेळेचं महत्त्व याची जाणीव ठेवा. त्यामुळे मानसिक स्पष्टता आणि समाधान मिळतं.


झोपताना विचार आणि वस्तू बाजूला ठेवा


झोपताना मन शांत ठेवणं महत्त्वाचं आहे. दिवसभर जे काही मनात साठलेलं असतं, ते सर्व बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा. मोबाईल, लॅपटॉप, कामाचं दडपण किंवा कुठलेही विचार दूर ठेवून झोपायला जा. शांत झोपेसाठी ही एक सोपी पण प्रभावी सवय आहे.


डोक्याची दिशा योग्य ठेवा


झोपताना डोकं उत्तर दिशेला ठेवू नये. अशा स्थितीत झोपल्यास शरीरातील रक्तप्रवाह मेंदूकडे वाढतो आणि त्यामुळे झोप अशांत होऊ शकते. शक्यतो डोकं दक्षिण किंवा पूर्वेकडे ठेवणं अधिक उपयुक्त ठरतं.


झोप ही केवळ शरीराची गरज नसून, मनाचीही विश्रांती आहे. वरील साधे उपाय आपल्या दैनंदिन जीवनात सहज स्वीकारता येतील आणि कोणतीही औषधं न वापरता झोपेची समस्या दूर करता येऊ शकते.


जर तुमची झोप सुधारली, तर तुमचं आरोग्य, मन:शांती आणि एकूण जीवनमान निश्चितच अधिक सकारात्मक होईल.

Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात