केरळच्या सुप्रसिद्ध मंदिरात सोन्याची चोरी, SIT चौकशीचा न्यायालयाचा आदेश

तिरुवनंतपुरम : सबरीमाला मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने केरळसाठी फार महत्त्वाचे आहे. सोन्याचा गाभारा आणि इतर स्थापत्याला दिलेला सोन्याचा मुलामा हे या मंदिराचे वैशिष्ट्य असल्याने अनेक पर्यटकांसाठी ते आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. मात्र या मंदिरातील सोने गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सबरीमाला मंदिरातील तांब्याच्या धातूने घडवलेल्या द्वारपालाच्या मूर्तींना सोन्याचा मुलामा देण्यात आला होता. मात्र यावरील सोने काही प्रमाणात गायब झाल्याचे समजले आहे. याबाबत केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने याचिकेची दखल घेऊन एसआयटी स्थापन करण्याचे आणि चौकशी करण्याचे निर्देश दिले. आता या प्रकरणाची सखोल चौकशी अपेक्षित आहे.


सबरीमाला मंदिर प्रकरणाच्या तपासणीसाठी उच्च न्यायालयाने पथकाचे नेतृत्व करण्यासाठी पोलिस अधीक्षक एस. ससिधरन यांची नियुक्ती केली आहे. तर पथकाच्या कामकाजाचे पर्यवेक्षण अतिरिक्त पोलिस महासंचालक एच.वेंकटेश करणार आहेत. या तपासाला त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने पूर्ण सहकार्य करावे, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.


सोन्याचा मुलामा दिलेल्या तांब्याच्या पत्र्यांच्या नोंदींनुसार, २०१९ मध्ये त्यांना नव्याने सोन्याचा मुलामा देण्यासाठी चैन्नईला पाठवण्यात आले होते. तेव्हा त्यांचे वजन ४२.८ किलोग्रॅम होते. तथापि, न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की,जेव्हा त्यांना नवीन सोन्याचा मुलामा देण्यात आला तेव्हा त्याचे वजन ३८.२५८ किलोग्रॅम होते. त्यामुळे उर्वरीत ४.४५ किलोग्रॅम सोने कुठे गायब झाले याबाबत तपासणी करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Bihar Election 2025 : बुरखा परिधान केलेल्या महिलांना मतदान करता येणार का ?

बिहार : बिहारमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मतदानाच्या तारखा

ट्रॅफिक का थांबले? पहा आणि कमेंट करुन सांगा... ब्रिजवरून ट्रेन गेली, आणि खालील रस्त्यावरचा 'तो' क्षण; व्हिडिओ व्हायरल

मुंबई: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे कधी आश्चर्यचकित करतात, तर कधी हसून पोट दुखवतात. असाच

बिहारमध्ये निवडणुकीचे बिगूल वाजले; मतदानाच्या तारखा जाहीर, कधी लागणार निकाल?

बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात, ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान, तर १४ नोव्हेंबर रोजी निकाल ७.४२ कोटी मतदार करणार

सर्वोच्च न्यायालयात घडली धक्कादायक घटना, वकिलाने केला सरन्यायाधीशांवर हल्ला

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक घटना घडली. एका वकिलाने सरन्यायाधीशांवर वस्तू फेकून हल्ला केला. या

बिहार विधानसभा निवडणुकील बिगुल आज वाजणार ?

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाची आज (सोमवार ६ ऑक्टोबर २०२५) संध्याकाळी चार वाजता दिल्लीत विज्ञान भवन येथे पत्रकार

मध्य प्रदेशात कफ सिरप प्रकरणात ११ मुलांच्या मृत्यूनंतर डॉक्टरला अटक

मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर भोपाळ (वृत्तसंस्था): छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया भागात कफ