केरळच्या सुप्रसिद्ध मंदिरात सोन्याची चोरी, SIT चौकशीचा न्यायालयाचा आदेश

तिरुवनंतपुरम : सबरीमाला मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने केरळसाठी फार महत्त्वाचे आहे. सोन्याचा गाभारा आणि इतर स्थापत्याला दिलेला सोन्याचा मुलामा हे या मंदिराचे वैशिष्ट्य असल्याने अनेक पर्यटकांसाठी ते आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. मात्र या मंदिरातील सोने गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सबरीमाला मंदिरातील तांब्याच्या धातूने घडवलेल्या द्वारपालाच्या मूर्तींना सोन्याचा मुलामा देण्यात आला होता. मात्र यावरील सोने काही प्रमाणात गायब झाल्याचे समजले आहे. याबाबत केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने याचिकेची दखल घेऊन एसआयटी स्थापन करण्याचे आणि चौकशी करण्याचे निर्देश दिले. आता या प्रकरणाची सखोल चौकशी अपेक्षित आहे.


सबरीमाला मंदिर प्रकरणाच्या तपासणीसाठी उच्च न्यायालयाने पथकाचे नेतृत्व करण्यासाठी पोलिस अधीक्षक एस. ससिधरन यांची नियुक्ती केली आहे. तर पथकाच्या कामकाजाचे पर्यवेक्षण अतिरिक्त पोलिस महासंचालक एच.वेंकटेश करणार आहेत. या तपासाला त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने पूर्ण सहकार्य करावे, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.


सोन्याचा मुलामा दिलेल्या तांब्याच्या पत्र्यांच्या नोंदींनुसार, २०१९ मध्ये त्यांना नव्याने सोन्याचा मुलामा देण्यासाठी चैन्नईला पाठवण्यात आले होते. तेव्हा त्यांचे वजन ४२.८ किलोग्रॅम होते. तथापि, न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की,जेव्हा त्यांना नवीन सोन्याचा मुलामा देण्यात आला तेव्हा त्याचे वजन ३८.२५८ किलोग्रॅम होते. त्यामुळे उर्वरीत ४.४५ किलोग्रॅम सोने कुठे गायब झाले याबाबत तपासणी करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार