केरळच्या सुप्रसिद्ध मंदिरात सोन्याची चोरी, SIT चौकशीचा न्यायालयाचा आदेश

तिरुवनंतपुरम : सबरीमाला मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने केरळसाठी फार महत्त्वाचे आहे. सोन्याचा गाभारा आणि इतर स्थापत्याला दिलेला सोन्याचा मुलामा हे या मंदिराचे वैशिष्ट्य असल्याने अनेक पर्यटकांसाठी ते आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. मात्र या मंदिरातील सोने गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सबरीमाला मंदिरातील तांब्याच्या धातूने घडवलेल्या द्वारपालाच्या मूर्तींना सोन्याचा मुलामा देण्यात आला होता. मात्र यावरील सोने काही प्रमाणात गायब झाल्याचे समजले आहे. याबाबत केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने याचिकेची दखल घेऊन एसआयटी स्थापन करण्याचे आणि चौकशी करण्याचे निर्देश दिले. आता या प्रकरणाची सखोल चौकशी अपेक्षित आहे.


सबरीमाला मंदिर प्रकरणाच्या तपासणीसाठी उच्च न्यायालयाने पथकाचे नेतृत्व करण्यासाठी पोलिस अधीक्षक एस. ससिधरन यांची नियुक्ती केली आहे. तर पथकाच्या कामकाजाचे पर्यवेक्षण अतिरिक्त पोलिस महासंचालक एच.वेंकटेश करणार आहेत. या तपासाला त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने पूर्ण सहकार्य करावे, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.


सोन्याचा मुलामा दिलेल्या तांब्याच्या पत्र्यांच्या नोंदींनुसार, २०१९ मध्ये त्यांना नव्याने सोन्याचा मुलामा देण्यासाठी चैन्नईला पाठवण्यात आले होते. तेव्हा त्यांचे वजन ४२.८ किलोग्रॅम होते. तथापि, न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की,जेव्हा त्यांना नवीन सोन्याचा मुलामा देण्यात आला तेव्हा त्याचे वजन ३८.२५८ किलोग्रॅम होते. त्यामुळे उर्वरीत ४.४५ किलोग्रॅम सोने कुठे गायब झाले याबाबत तपासणी करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या