सरन्यायाधीशांवरील हल्ल्याने प्रत्येक भारतीय नाराज, पंतप्रधानांनी केले ट्वीट

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावरील हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबत सरन्यायाधीश बी.आर.गवई यांच्याशी बातचीत केली. पंतप्रधान मोदी म्हणाले, मी भारताचे सरन्यायाधीश बी.आर.गवई यांच्याशी बातचीत केली. आज सुप्रीम कोर्ट परिसरात त्यांच्यावर झालेला हा हल्ला प्रत्येक भारतीयाला चीड आणणारा आहे. आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांसाठी कोणतेही स्थान नाही. ही लाजिरवाणी बाब आहे.


 


दरम्यान, सरन्यायाधीश यांच्यावर जोडा फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर याला बार कौन्सिल ऑफ इंडिया (बीसीआय) ने तात्काळ निलंबित केलं आहे. निलंबनाच्या काळात त्यांना कोणत्याही न्यायालय, ट्रिब्युनल किंवा अधिकरणात हजर राहण्याची, वकिली करण्याची किंवा केस चालवण्याची परवानगी दिली जाणार नाही.


बीसीआय ने राकेश किशोर यांचा वकिलीचा परवाना रद्द केला असून, या प्रकरणी अनुशासनात्मक कारवाई सुरू केली जाणार आहे. त्यांना १५ दिवसांत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून, त्यांनी ही कारवाई का सुरू ठेवू नये हे स्पष्ट करावं लागेल. त्यांच्या उत्तरानंतर आणि तपासाच्या आधारावर कौन्सिल योग्य तो निर्णय घेईल.


दुसरीकडे, सीजेआय बी. आर. गवई यांनी स्वतः राकेश किशोरविरुद्ध कोणतीही कारवाई न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ सूत्रांनुसार,सीजेआय यांनी रजिस्ट्री अधिकाऱ्यांना सांगितले की, या घटनेकडे उपेक्षेने पाहावं आणि दुर्लक्षित करावं.जेवणाच्या सुट्टीत, सीजेआय न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी सुप्रीम कोर्टाचे सेक्रेटरी जनरल, सुरक्षा प्रमुख व इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सतर्कता वाढवण्यावर चर्चा केली.


वकील राकेश किशोर याने सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांच्या दिशेने जोडा फेकण्याचा प्रयत्न केला आणि जोरात ओरडला, “भारत सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही!” त्याला तत्काळ कोर्ट परिसरात ताब्यात घेण्यात आलं. मात्र काही वेळातच दिल्ली पोलिसांनी त्याची कोर्टातच सुटका केली. हा जोडा न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्याकडे गेला पण त्यांना लागला नाही. नंतर किशोरने कबूल केलं की, हा हल्ला सीजेआय गवई यांच्यावरच होता, आणि न्यायमूर्ती चंद्रन यांची माफीही मागितली.

Comments
Add Comment

‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या मारवाडी मानसिकता थांबवू शकते’

आयसीएआर-सेंट्रल अॅरिड झोन रिसर्चचे संचालक डॉ. तंवर यांचे भाष्य जोधपूर : ऐतिहासिकदृष्ट्या राजस्थान आणि

‘वंदे भारत’साठी जोधपूरमध्ये पहिला देखभाल डेपो

मेंटेनन्सचा विषय निकाली; दिल्ली, मुंबई, बंगळूरुमध्येही होणार उभारणी जोधपूर  : जलद गतीने धावणारी वंदे भारत

सिग्नल ओव्हरशूट! छत्तीसगडमध्ये झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघाताचे कारण आले समोर

छत्तीसगड: छत्तीसगडमधील बिलासपूर येथे काल (४ नोव्हेंबर) सायंकाळी मेमू ट्रेनचा आणि मालगाडीचा भीषण अपघात झाला. हा

बिहारमध्ये कमळ फुलणार!

ओपनियन पोलच्या अंदाजानुसार एनडीएचे बिहारमध्ये सरकार नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा ६

मतदार यादी पुनरिक्षणविरोधात 'इंडिया'ची देशव्यापी आंदोलनाची योजना

नवी दिल्ली : 'इंडिया' आघाडीने निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर)

Barabanki Road Accident : वेगमर्यादेचा बळी! बाराबंकीत ट्रक-अर्टिगाच्या धडकेत ६ ठार, ८ गंभीर जखमी; कारचा अक्षरशः चक्काचूर!

बाराबंकी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बाराबंकी (Barabanki) जिल्ह्यात सोमवारी रात्री भीषण रस्ते अपघात झाल्याची घटना समोर