यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमा ? जाणून घ्या या तिथीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त

कोजागिरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणार भारतीय हिंदू संस्कृतीमधील महत्वाचा दिवस आहे. आणि इंग्रजी कॅलेंडरनुसार हा दिवस सप्टेंबर किंवा ऑक्टोबर या महिन्यात येतो. कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा. या पौर्णिमेचे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी देवी निद्रेतून जागी होते. नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी युद्ध करून थकते आणि कोजागिरी पौर्णिमेपर्यंत झोपी जाते ,अशी मान्यता आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची आराधना केली जाते.



कोजागिरी पौर्णिमेचे महत्व


कोजागिरी पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो याच दिवशी माता लक्ष्मी समुद्र मंथनातून प्रकट झाली. या दिवशी भगवान श्रीकृष्ण वृंदावनात रासलीला रचतात अशी मान्यता आहे


२०२५ मध्ये कोजागिरी पौर्णिमा केव्हा आहे ?

हिंदू पंचांगानुसार आश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा यंदा सोमवार ६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:२३ वाजता सुरु होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार ७ ऑक्टोबर सकाळी ९:१६ वाजता संपणार आहे. त्यामुळे तिथी नुसार ६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येईल



मुहूर्त


कोजागिरी पौर्णिमा : शुभ मुहूर्त ६ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११:४५ पासून, ७ ऑक्टोबर रोजी रात्री १२:३४ पर्यंत असेल


कोजागिरीच्या पूजेसाठी ४९ मिनिटांचा शुभ मुहूर्त असणार आहे


चंद्रोदय : ६ ऑक्टोबर , सायंकाळी ५:२७ वाजता होईल


या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो


या रात्री चंद्र आपल्या १६ कलांमध्ये असतो. चंद्राची किरणे औषधी अमृतमयी मानली जातात. दूध हे चंद्र प्रकाशात ठेवण्याची आपल्याकडे पद्धत आहे. चंद्राची किरणे दुधात मिसळतात आणि दूध गुणकारी होते आजारी असलेल्या माणसाला ते प्यायला दिल्याने आजार बरे होण्यास मदत होते, असे सांगतात. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.



भारतात वेगवेगळ्या प्रांतात कोजागिरी कशी साजरी केली जाते.


भारतातील अनेक प्रांत ही रात्र आपापल्या पद्धतीने साजरी करतात. गुजरातमध्ये गरबा खेळतात, हिमाचलमध्ये जत्रा भरते , राजस्थानमध्ये शुभ्र पांढरी वस्त्रे नेसून चांदीचे दागिने घालून चंद्राची पूजा केली जाते ओडिशा मध्ये गजलक्ष्मीची पूजा केली जाते.

Comments
Add Comment

रत्नागिरी जिल्ह्यावर मळभ व पावसाचे सावट; आंबा-काजू उत्पादन धोक्यात

रत्नागिरी  : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट घोंगावत आहे. जिल्ह्यात पावसाचे

डोंट बी शाय’सह प्राइम व्हिडिओ आणि इटर्नल सनशाइन प्रोडक्शन्सच लँडमार्क कोलॅबोरेशन जाहीर

प्राइम व्हिडिओ × इटर्नल सनशाइन प्रोडक्शन्स: रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘डोंट बी शाय’मधून नव्या प्रवासाची

मंडणगडमध्ये दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढतीने वाढवली निवडणुकीची उत्कंठा

मंडणगड : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विरोधकांना ६-० असा

उल्हासनगरमध्ये महापौरपदासाठी शिवसेना, उबाठा आणि टीओकेत रस्सीखेच

भाजपची रणनीती निर्णायक उल्हासनगर :उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी राजकारण आता केवळ संख्याबळावर

विमानतळ प्रकल्पात मच्छीमारांचे हित जपणार

खासदार सवरा यांनी लोकसभेत लावून धरला प्रश्न पालघर : पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी प्रस्तावित असलेल्या विमानतळ

महापालिकेला १० वर्षांनंतर मिळणार विरोधी पक्षनेता

पाच वर्षे संख्याबळ नसल्याने पद होते रिक्त  विरार :वसई-विरार महापालिकेच्या यापूर्वी सन २०१० आणि २०१५ मध्ये अशा