यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमा ? जाणून घ्या या तिथीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त

कोजागिरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणार भारतीय हिंदू संस्कृतीमधील महत्वाचा दिवस आहे. आणि इंग्रजी कॅलेंडरनुसार हा दिवस सप्टेंबर किंवा ऑक्टोबर या महिन्यात येतो. कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा. या पौर्णिमेचे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी देवी निद्रेतून जागी होते. नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी युद्ध करून थकते आणि कोजागिरी पौर्णिमेपर्यंत झोपी जाते ,अशी मान्यता आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची आराधना केली जाते.



कोजागिरी पौर्णिमेचे महत्व


कोजागिरी पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो याच दिवशी माता लक्ष्मी समुद्र मंथनातून प्रकट झाली. या दिवशी भगवान श्रीकृष्ण वृंदावनात रासलीला रचतात अशी मान्यता आहे


२०२५ मध्ये कोजागिरी पौर्णिमा केव्हा आहे ?

हिंदू पंचांगानुसार आश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा यंदा सोमवार ६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:२३ वाजता सुरु होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार ७ ऑक्टोबर सकाळी ९:१६ वाजता संपणार आहे. त्यामुळे तिथी नुसार ६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येईल



मुहूर्त


कोजागिरी पौर्णिमा : शुभ मुहूर्त ६ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११:४५ पासून, ७ ऑक्टोबर रोजी रात्री १२:३४ पर्यंत असेल


कोजागिरीच्या पूजेसाठी ४९ मिनिटांचा शुभ मुहूर्त असणार आहे


चंद्रोदय : ६ ऑक्टोबर , सायंकाळी ५:२७ वाजता होईल


या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो


या रात्री चंद्र आपल्या १६ कलांमध्ये असतो. चंद्राची किरणे औषधी अमृतमयी मानली जातात. दूध हे चंद्र प्रकाशात ठेवण्याची आपल्याकडे पद्धत आहे. चंद्राची किरणे दुधात मिसळतात आणि दूध गुणकारी होते आजारी असलेल्या माणसाला ते प्यायला दिल्याने आजार बरे होण्यास मदत होते, असे सांगतात. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.



भारतात वेगवेगळ्या प्रांतात कोजागिरी कशी साजरी केली जाते.


भारतातील अनेक प्रांत ही रात्र आपापल्या पद्धतीने साजरी करतात. गुजरातमध्ये गरबा खेळतात, हिमाचलमध्ये जत्रा भरते , राजस्थानमध्ये शुभ्र पांढरी वस्त्रे नेसून चांदीचे दागिने घालून चंद्राची पूजा केली जाते ओडिशा मध्ये गजलक्ष्मीची पूजा केली जाते.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे चिपळूणमध्ये पुराचा धोका

चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण शहराला असलेल्या पुराच्या धोक्याबाबत उपाययोजना सूचविण्यासाठी राज्य सरकारने जलसंपदा

मंत्री नितेश राणेंचा वैभववाडीत उबाठावर मोठा घाव!

मंगेश लोकेंसह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश ओरोस (वार्ताहर) : वैभववाडी तालुक्यात उद्धव

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

रायगड जिल्हा परिषदेत २ हजार ६०९ पदे रिक्त

अलिबाग (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विकासाला गती देण्याचे काम रायगड जिल्हा परिषदेचे असले, तरी जिल्हा परिषदेत

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना