यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमा ? जाणून घ्या या तिथीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त

कोजागिरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणार भारतीय हिंदू संस्कृतीमधील महत्वाचा दिवस आहे. आणि इंग्रजी कॅलेंडरनुसार हा दिवस सप्टेंबर किंवा ऑक्टोबर या महिन्यात येतो. कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा. या पौर्णिमेचे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी देवी निद्रेतून जागी होते. नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी युद्ध करून थकते आणि कोजागिरी पौर्णिमेपर्यंत झोपी जाते ,अशी मान्यता आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची आराधना केली जाते.



कोजागिरी पौर्णिमेचे महत्व


कोजागिरी पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो याच दिवशी माता लक्ष्मी समुद्र मंथनातून प्रकट झाली. या दिवशी भगवान श्रीकृष्ण वृंदावनात रासलीला रचतात अशी मान्यता आहे


२०२५ मध्ये कोजागिरी पौर्णिमा केव्हा आहे ?

हिंदू पंचांगानुसार आश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा यंदा सोमवार ६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:२३ वाजता सुरु होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार ७ ऑक्टोबर सकाळी ९:१६ वाजता संपणार आहे. त्यामुळे तिथी नुसार ६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येईल



मुहूर्त


कोजागिरी पौर्णिमा : शुभ मुहूर्त ६ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११:४५ पासून, ७ ऑक्टोबर रोजी रात्री १२:३४ पर्यंत असेल


कोजागिरीच्या पूजेसाठी ४९ मिनिटांचा शुभ मुहूर्त असणार आहे


चंद्रोदय : ६ ऑक्टोबर , सायंकाळी ५:२७ वाजता होईल


या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो


या रात्री चंद्र आपल्या १६ कलांमध्ये असतो. चंद्राची किरणे औषधी अमृतमयी मानली जातात. दूध हे चंद्र प्रकाशात ठेवण्याची आपल्याकडे पद्धत आहे. चंद्राची किरणे दुधात मिसळतात आणि दूध गुणकारी होते आजारी असलेल्या माणसाला ते प्यायला दिल्याने आजार बरे होण्यास मदत होते, असे सांगतात. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.



भारतात वेगवेगळ्या प्रांतात कोजागिरी कशी साजरी केली जाते.


भारतातील अनेक प्रांत ही रात्र आपापल्या पद्धतीने साजरी करतात. गुजरातमध्ये गरबा खेळतात, हिमाचलमध्ये जत्रा भरते , राजस्थानमध्ये शुभ्र पांढरी वस्त्रे नेसून चांदीचे दागिने घालून चंद्राची पूजा केली जाते ओडिशा मध्ये गजलक्ष्मीची पूजा केली जाते.

Comments
Add Comment

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या 'त्या' कृतीवरून वाद; राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याने पुण्यात तक्रार

हार्दिक पांड्या याच्याविरोधात राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप करत पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अर्जुन आणि सानियाला दिल्या अमित शाह यांनी खास पत्रातून शुभेच्छा

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबाला विशेष

“त्यांनी मला शिक्षकासारखे सगळे समजावून सांगितले”

मुंबई : क्रांती प्रकाश झा हे भारतीय मनोरंजन क्षेत्रातील एक ओळखले जाणारे अभिनेते आहेत. त्यांनी चित्रपट आणि वेब

'सनई चौघडे' मध्ये पहिल्यांदाच आईची भूमिका साकारणार अदिती सारंगधर

मुंबई : ‘सनई चौघडे’ मालिकेत लाडकी अभिनेत्री अदिती सारंगधर एका दमदार आणि महत्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत

समर्थ ई-मोबिलिटीकडून भारतात डिझाइन करण्‍यात आलेला १०० टक्‍के स्‍वदेशी फुल-स्‍टॅक ईव्‍ही टेक्‍नॉलॉजी प्‍लॅटफॉर्म लाँच

अहमदाबाद : भारताच्‍या इलेक्ट्रिक गतीशीलता प्रवासामध्‍ये महत्त्वपूर्ण टप्‍पा गाठत समर्थ ई-मोबिलिटी प्रा. लि. या

अक्षय कुमारच्या भूतबंगला चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, टीझर गुरुवारी प्रदर्शित होणार

मुंबई : बालाजी मोशन पिक्चर्सने भूतबंगला चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता