यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमा ? जाणून घ्या या तिथीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त

कोजागिरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणार भारतीय हिंदू संस्कृतीमधील महत्वाचा दिवस आहे. आणि इंग्रजी कॅलेंडरनुसार हा दिवस सप्टेंबर किंवा ऑक्टोबर या महिन्यात येतो. कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा. या पौर्णिमेचे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी देवी निद्रेतून जागी होते. नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी युद्ध करून थकते आणि कोजागिरी पौर्णिमेपर्यंत झोपी जाते ,अशी मान्यता आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची आराधना केली जाते.



कोजागिरी पौर्णिमेचे महत्व


कोजागिरी पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो याच दिवशी माता लक्ष्मी समुद्र मंथनातून प्रकट झाली. या दिवशी भगवान श्रीकृष्ण वृंदावनात रासलीला रचतात अशी मान्यता आहे


२०२५ मध्ये कोजागिरी पौर्णिमा केव्हा आहे ?

हिंदू पंचांगानुसार आश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा यंदा सोमवार ६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:२३ वाजता सुरु होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार ७ ऑक्टोबर सकाळी ९:१६ वाजता संपणार आहे. त्यामुळे तिथी नुसार ६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येईल



मुहूर्त


कोजागिरी पौर्णिमा : शुभ मुहूर्त ६ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११:४५ पासून, ७ ऑक्टोबर रोजी रात्री १२:३४ पर्यंत असेल


कोजागिरीच्या पूजेसाठी ४९ मिनिटांचा शुभ मुहूर्त असणार आहे


चंद्रोदय : ६ ऑक्टोबर , सायंकाळी ५:२७ वाजता होईल


या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो


या रात्री चंद्र आपल्या १६ कलांमध्ये असतो. चंद्राची किरणे औषधी अमृतमयी मानली जातात. दूध हे चंद्र प्रकाशात ठेवण्याची आपल्याकडे पद्धत आहे. चंद्राची किरणे दुधात मिसळतात आणि दूध गुणकारी होते आजारी असलेल्या माणसाला ते प्यायला दिल्याने आजार बरे होण्यास मदत होते, असे सांगतात. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.



भारतात वेगवेगळ्या प्रांतात कोजागिरी कशी साजरी केली जाते.


भारतातील अनेक प्रांत ही रात्र आपापल्या पद्धतीने साजरी करतात. गुजरातमध्ये गरबा खेळतात, हिमाचलमध्ये जत्रा भरते , राजस्थानमध्ये शुभ्र पांढरी वस्त्रे नेसून चांदीचे दागिने घालून चंद्राची पूजा केली जाते ओडिशा मध्ये गजलक्ष्मीची पूजा केली जाते.

Comments
Add Comment

इंडिगोचे चार विमान निरीक्षक बडतर्फ

नवी दिल्ली : भारताची हवाई वाहतूक नियामक संस्था, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने संकटात सापडलेल्या

‘एकाकी’मधील जॉनर बदलासाठी आशिष चंचलानीचे एस.एस. राजामौलींने केले कौतुक

आशिष चंचलानी, जे भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल स्टार्सपैकी एक आहेत आणि ज्यांची देशभरात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे,

राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ

मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट नवी दिल्ली : उत्तरेकडून शीत लहरी महाराष्ट्राकडे वेगाने येत

ठाण्यात आणखी चार दिवस ५० टक्के पाणीकपात

ठाणे : ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे बंधारा येथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी १०००मि.

करतात काय रात्रीच्या वेळी मुली Google वर सर्च ; धक्कादायक अहवालाने तुम्हीही हादराल

या गोष्टी मुली रात्रीच्या वेळी गुगलवर सर्च करताना दिसत असल्याचं ही समोर आलं आहे. मुंबई : 'गुगल ईयर इन सर्च २०२५

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर ; म्हणून न्यायालयाने पुढे ढकलली सुनावणी

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे.