तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद


छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवरात्रीच्या शेवटच्या टप्प्यात येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, गैरसोय टाळण्यासाठी दोन दिवसांकरिता व्हीआयपी आणि देणगी दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.


मंदिर संस्थानच्या प्रशासक तथा तहसीलदार माया माने यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या पत्रकानुसार, यावर्षी शारदीय नवरात्र महोत्सव दिनांक २२ सप्टेंबर २०२५ ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत संपन्न होत आहे. या काळात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांसह देशभरातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात दाखल होतात.विशेषतः महोत्सवाच्या अखेरीस, सोमवार, दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ आणि मंगळवार, दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे. या दिवशी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणेच भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी आणि त्यामुळे भाविकांची होणारी गैरसोय टाळण्याच्या उद्देशाने मंदिर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.


या निर्णयानुसार, दिनांक ६ आणि ७ ऑक्टोबर २०२५ या दोन दिवशी ५०० रुपयांचे व्ही.आय.पी. संदर्भ दर्शन आणि १००० रुपयांचे सशुल्क देणगी दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेमंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जरी दोन विशेष दर्शन प्रकार बंद असले तरी, सर्वसामान्य भाविकांसाठी नियमित धर्मदर्शन (विनाशुल्क), मुखदर्शन आणि ३०० रुपयांचे सशुल्क देणगी दर्शन पास पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. तसेच, घाटशीळ पार्किंग मार्गावरील वाहतूकही नियमितपणे सुरू राहील.सर्व भाविकांनी या बदलाची नोंद घेऊन मंदिर प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दर्शनाचे नियोजन सुरळीत पार पडावे आणि भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.


Comments
Add Comment

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना