दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७ जणांचे प्राण गेले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे दार्जिलिंगचा सिक्कीमशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे, तर अनेक महत्त्वाचे रस्तेही बंद झाले आहेत.


गोरखालँड प्रादेशिक प्रशासनाने (GTA) खबरदारीचा उपाय म्हणून टायगर हिल, रॉक गार्डनसह प्रमुख पर्यटनस्थळे तात्पुरती बंद केली आहेत. याशिवाय टॉय ट्रेन सेवा देखील स्थगित करण्यात आली आहे.


दार्जिलिंग, मिरिक आणि सुखियापोखरी परिसरात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्यामुळे बचाव कार्य सुरु असून, स्थानिक पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके युद्धपातळीवर काम करत आहेत.


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून, केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.


दुर्गापूजेनंतर दार्जिलिंगमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे अनेक पर्यटक अडकले असल्याची शक्यता आहे. बंगाल पोलिसांनी ९१४७८८९०७८ हा हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे, ज्यावर अडकलेल्या पर्यटकांना मदतीसाठी संपर्क करता येईल.


दरम्यान, उत्तर बंगालमधील जलपाईगुडी, सिलिगुडी, कूचबिहार या भागातही पावसाचा जोर कायम आहे. काही ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.


हवामान खात्याने ७ ऑक्टोबरपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असून, सिक्कीमसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिक व पर्यटकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने