IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय


अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारताने या कसोटीत एक डाव आणि १४० धावांनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत १६२ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने पहिल्या डावात ५ बाद ४४८ धावा केल्या. आज तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजला दुसऱ्या डावात केवळ १४६ धावाच करता आल्या. रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराजने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना नाकीनऊ आणले. 


आज पुन्हा वेस्ट इंडिजला फलंदाजी करायची संधी मिळाली मात्र तीही त्यांनी गमावली. भारताच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत वेस्ट इंडिजचा संपूर्ण डाव तिसऱ्याच दिवशी संपवला. यासोबतच भारताने या कसोटीत एक डाव आणि १४० धावांनी विजय मिळवला आहे.


याआधी तिसऱ्या दिवसाच्या सुरूवातीलाच भारताने आपला पहिला डाव ५ बाद ४४८वर घोषित केला होता. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात केवळ १६२ धावा केल्या होत्या, ज्याला प्रत्युत्तर देताना भारताने दमदार फलंदाजी केली. दुसऱ्या दिवशी के. एल. राहुल (१००), युवा यष्टिरक्षक ध्रुव जुरेल (१२५) आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा (नाबाद १०४) यांनी शानदार शतके झळकावत भारताला ४०० च्या पार नेले. कर्णधार शुभमन गिलनेही ५० धावांचे महत्त्वाचे योगदान दिले.


दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रवींद्र जडेजा १०४ आणि वॉशिंग्टन सुंदर ९ धावांवर खेळत होता. तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज मोठी धावसंख्या उभारतील अशी अपेक्षा असताना, कर्णधार शुभमन गिलने डाव घोषित करण्याचा धडाकेबाज निर्णय घेतला. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाला दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले. मात्र त्यांच्या एकाही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या डावात भारताच्या रवींद्र जडेजानेविकेट घेतल्या तर मोहम्मद सिराजने ३ आणि कुलदीप यादवने २ आणि वॉशिंग्टन सुंदरनेविकेट घेतली. 


Comments
Add Comment

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी; मुख्यमंत्र्यांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्याचा संकल्प करण्याचे आवाहन

पुणे: राज्यातील विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'

अटीतटीच्या लढतीत सोलापूरच्या 'बाहुबली'चा ४-३ ने पराभव पुणे : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने आपल्या अनुभवाच्या

Maharashtra Kesari 2026 : महाराष्ट्र केसरी विजेता होणार मालामाल; फॉर्च्युनर कारसह मिळणार लाखोंची बक्षिसे

कुस्तीप्रेमींच्या उत्सुकतेचा कळस गाठलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना आज म्हणजेच

IPL 2026 : हर्षितनंतर आकाश दीपदेखील संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर

आयपीएल २०२६ च्या आधी कोलकाता नाईट रायडर्सच्या अडचणी कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. हर्षित राणानंतर,

IPL 2026 : आयपीएल २०२६ ला दुखापतींचं ग्रहण; अनेक क्रिकेटपटूंच्या दुखापतींमुळे फ्रँचायझींच्या चिंतेत वाढ

मुंबई : आयपीएल २०२६ सुरू होण्यास केवळ एक आठवडा शिल्लक असतानाच, अनेक संघ दुखापतींशी झुंजत आहेत. १० पैकी आठ

Jasprit Bumrah : आयसीसी टी-२० क्रमवारी जसप्रीत बुमराहची टॉप ५ मध्ये नोंद

मुंबई : भारताने ८ मार्च रोजी टी२० विश्वचषक जिंकल्यापासून एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आणि