IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय


अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारताने या कसोटीत एक डाव आणि १४० धावांनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत १६२ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने पहिल्या डावात ५ बाद ४४८ धावा केल्या. आज तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजला दुसऱ्या डावात केवळ १४६ धावाच करता आल्या. रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराजने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना नाकीनऊ आणले. 


आज पुन्हा वेस्ट इंडिजला फलंदाजी करायची संधी मिळाली मात्र तीही त्यांनी गमावली. भारताच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत वेस्ट इंडिजचा संपूर्ण डाव तिसऱ्याच दिवशी संपवला. यासोबतच भारताने या कसोटीत एक डाव आणि १४० धावांनी विजय मिळवला आहे.


याआधी तिसऱ्या दिवसाच्या सुरूवातीलाच भारताने आपला पहिला डाव ५ बाद ४४८वर घोषित केला होता. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात केवळ १६२ धावा केल्या होत्या, ज्याला प्रत्युत्तर देताना भारताने दमदार फलंदाजी केली. दुसऱ्या दिवशी के. एल. राहुल (१००), युवा यष्टिरक्षक ध्रुव जुरेल (१२५) आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा (नाबाद १०४) यांनी शानदार शतके झळकावत भारताला ४०० च्या पार नेले. कर्णधार शुभमन गिलनेही ५० धावांचे महत्त्वाचे योगदान दिले.


दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रवींद्र जडेजा १०४ आणि वॉशिंग्टन सुंदर ९ धावांवर खेळत होता. तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज मोठी धावसंख्या उभारतील अशी अपेक्षा असताना, कर्णधार शुभमन गिलने डाव घोषित करण्याचा धडाकेबाज निर्णय घेतला. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाला दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले. मात्र त्यांच्या एकाही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या डावात भारताच्या रवींद्र जडेजानेविकेट घेतल्या तर मोहम्मद सिराजने ३ आणि कुलदीप यादवने २ आणि वॉशिंग्टन सुंदरनेविकेट घेतली. 


Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए