मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात 'या' दिवशी १० टक्के राहणार पाणीकपात

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलोव्‍हॅट विद्युत केंद्रामधील विद्युत मीटर अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. नियोजनानुसार, मीटर जोडणीचे काम मंगळवारी ०७ ऑक्‍टोबर, बुधवार दिनांक ०८ ऑक्‍टोबर आणि गुरूवारी ०९ ऑक्‍टोबर २०२५ रोजी दररोज दुपारी १२.३० ते ०३.०० वाजेपर्यंत म्‍हणजेच अडीच तास केले जाणार आहे. त्यामुळे शहर विभाग आणि पूर्व उपनगरांतील बहुतांश विभागांचा पाणीपुरवठा सलग तीन दिवस प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्‍यामुळे मंगळवार ७ ऑक्‍टोबर ते गुरूवार ०९ ऑक्‍टोबर २०२५ असे तीन दिवस १० टक्के पाणी कपात केली जाणार आहे.


शहर विभागातील ए, बी, ई, एफ दक्षिण आणि एफ उत्‍तर विभागात संपूर्ण कार्यक्षेत्रात तसेच, पूर्व उपनगरांतील एम पूर्व आणि एम पश्चिम विभागात संपूर्ण परिसरात १० टक्के पाणी कपात लागू केली जाणार आहे. पूर्व उपनगरांतील एल विभाग (कुर्ला पूर्व),  एन विभागात विक्रोळी, घाटकोपर पश्चिम व घाटकोपर पूर्व, एस विभागात भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पूर्व आणि टी विभागाात मुलुंड पूर्व आणि पश्चिम क्षेत्रात १० टक्‍के पाणी कपात लागू राहणार आहे.


या परिसरातील नागरिकांनी उपरोक्त तीन दिवसांच्‍या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करावा. पाणी कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.



कोणत्या भागात असेल पाणीकपात


ए विभाग - संपूर्ण विभाग


बी विभाग - संपूर्ण विभाग


ई विभाग - संपूर्ण विभाग


एफ दक्षिण विभाग - संपूर्ण विभाग


एफ उत्तर विभाग - संपूर्ण विभाग



पूर्व उपनगरे :    


एल विभाग- कुर्ला पूर्व क्षेत्र


एम पूर्व विभाग - संपूर्ण विभाग


एम पश्चिम विभाग - संपूर्ण विभाग


एन विभाग - विक्रोळी, घाटकोपर पूर्व, घाटकोपर


एस विभाग - भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पूर्व क्षेत्र


टी विभाग - मुलुंड पूर्व आणि पश्चिम क्षेत्र

Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती; महा सारथी पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन