ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित आणि कोहलीने आपला शेवटचा सामना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये खेळला होता. त्यानंतर दोघांनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपापल्या संघाचे प्रतिनिधित्व केले. कोहली आणि रोहितने इंग्लंड दौऱ्याच्या आधी कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले होते. यानंतर शुभमन गिलला कसोटी कर्णधार बनवण्यात आले होते.


रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीयला आधीच निवृत्ती घेतली आहे. दोन्ही खेळाडूंनी २०२४च्या भारताच्या वर्ल्डकप विजयानंतर टी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्तीची घोषणा केली होती. अशातच हे दोन्ही खेळाडू केवळ वनडे क्रिकेटसाठी उपलब्ध आहेत. आता कोहली आणि रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांसाठी भारतीय संघात सामील होऊ शकतात.


बीसीसीआय शनिवारी ४ ऑक्टोबरला वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाईल. कोहली आणि रोहितला वनडे संघात सामील करण्याची शक्यता आहे. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. यात पहिले तीन वनडे सामने १८ ऑक्टोबरपासून होणार आहेत. यानंतर पाच सामन्यांची टी-२० मालिका २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहे.



भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक


१९ ऑक्टोबर- पहिली वनडे, पर्थ
२३ ऑक्टोबर - दुसरी वनडे, अॅडलेड
२५ ऑक्टोबर - तिसरी वनडे, सिडनी
२९ ऑक्टोबर - पहिली टी-२०, कॅनबेरा
३१ ऑक्टोबर- दुसरी टी-२०, मेलबर्न
२ नोव्हेंबर - तिसरी टी-२०, होबार्ट
६ नोव्हेंबर - चौथी टी-२०, गोल्ड कोस्ट
८ नोव्हेंबर - पाचवी टी-२०, ब्रिस्बेन

Comments
Add Comment

Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...

मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील