ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित आणि कोहलीने आपला शेवटचा सामना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये खेळला होता. त्यानंतर दोघांनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपापल्या संघाचे प्रतिनिधित्व केले. कोहली आणि रोहितने इंग्लंड दौऱ्याच्या आधी कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले होते. यानंतर शुभमन गिलला कसोटी कर्णधार बनवण्यात आले होते.


रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीयला आधीच निवृत्ती घेतली आहे. दोन्ही खेळाडूंनी २०२४च्या भारताच्या वर्ल्डकप विजयानंतर टी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्तीची घोषणा केली होती. अशातच हे दोन्ही खेळाडू केवळ वनडे क्रिकेटसाठी उपलब्ध आहेत. आता कोहली आणि रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांसाठी भारतीय संघात सामील होऊ शकतात.


बीसीसीआय शनिवारी ४ ऑक्टोबरला वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाईल. कोहली आणि रोहितला वनडे संघात सामील करण्याची शक्यता आहे. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. यात पहिले तीन वनडे सामने १८ ऑक्टोबरपासून होणार आहेत. यानंतर पाच सामन्यांची टी-२० मालिका २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहे.



भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक


१९ ऑक्टोबर- पहिली वनडे, पर्थ
२३ ऑक्टोबर - दुसरी वनडे, अॅडलेड
२५ ऑक्टोबर - तिसरी वनडे, सिडनी
२९ ऑक्टोबर - पहिली टी-२०, कॅनबेरा
३१ ऑक्टोबर- दुसरी टी-२०, मेलबर्न
२ नोव्हेंबर - तिसरी टी-२०, होबार्ट
६ नोव्हेंबर - चौथी टी-२०, गोल्ड कोस्ट
८ नोव्हेंबर - पाचवी टी-२०, ब्रिस्बेन

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य