शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?


मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांच्यात नामांतराच्या मुद्यावर चर्चा झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मुंबईत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली.


भूमिपुत्रांना विमानतळावर नोकऱ्या मिळाव्या यासाठी महामोर्चा काढण्याची तयारी सुरू झाली आहे. या मोर्चात मनसे, शेकाप यांच्या व्यतिरिक्त राज्यातले विरोधी पक्ष सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे. या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याचे समजते.


नियोजित आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी रविवारी अलिबागमध्ये जयंत पाटील यांच्या निवासस्थानी आणखी एक बैठक होणार आहे. या बैठकीला कोणकोणत्या पक्षाचे प्रतिनिधी येतात यावरुन मोर्चा किती मोठा असेल याचा अंदाज येईल.


Comments
Add Comment

‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा'

मुंबई : प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून

विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या नगरसेवकांना आसने टोचू लागली

महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेत होणार सुधारणार गटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत प्रशासनाला दिल्या

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांविरोधात कारवाईला वेग

मुंबई : मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांच्या

मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

खारबाव येथील नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द मुंबई (प्रतिनिधी) : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि

कांजूरमार्ग कारशेडच्या जागेबाबत खासगी विकासकांची याचिका फेटाळली

मुंबई : ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या कांजूरमार्ग

Water Metro Project: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच सुरु होणार 'जल मेट्रो प्रकल्प'

मुंबई: मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार