शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?


मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांच्यात नामांतराच्या मुद्यावर चर्चा झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मुंबईत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली.


भूमिपुत्रांना विमानतळावर नोकऱ्या मिळाव्या यासाठी महामोर्चा काढण्याची तयारी सुरू झाली आहे. या मोर्चात मनसे, शेकाप यांच्या व्यतिरिक्त राज्यातले विरोधी पक्ष सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे. या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याचे समजते.


नियोजित आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी रविवारी अलिबागमध्ये जयंत पाटील यांच्या निवासस्थानी आणखी एक बैठक होणार आहे. या बैठकीला कोणकोणत्या पक्षाचे प्रतिनिधी येतात यावरुन मोर्चा किती मोठा असेल याचा अंदाज येईल.


Comments
Add Comment

Borivali-Gorai Jetty : बोरिवली-गोराई आता फक्त १५ मिनिटांत! तासनतासांच्या प्रवासातून मुंबईकरांची सुटका; रो-रो जेट्टीचं काम सुरू

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बोरिवली आणि गोराई

Comrade Govind Pansare: गोविंद पानसरे हत्याकांडातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा मृत्यू

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांडा प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा आज सकाळी सांगलीत मृत्यू

Akshay Kumar Car Accident : अक्षय कुमारच्या डोळ्यासमोर सुरक्षा ताफ्याचा भीषण अपघात; मर्सिडीजने रिक्षेला चिरडले, जुहू परिसरात मध्यरात्री खळबळ

मुंबई : बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या सुरक्षा ताफ्यातील वाहनाचा सोमवारी रात्री जुहू परिसरात भीषण

स्मार्टफोनवर येणार ९ नवीन इमोजी

युनिकोड १८.० अपडेटमध्ये नव्या इमोजींचा समावेश आजच्या डिजिटल जगात आपण शब्दांपेक्षा इमोजीचा वापर अधिक करतो.

बहुभाषिक चेहऱ्यातही मराठी टक्का भक्कम

मुंबई : महापालिकेच्या निकालाचे आकडे मुंबईच्या बदलत्या राजकीय आणि सामाजिक समीकरणावर शिक्कामोर्तब करीत आहेत.

‘एमआयएम’चे तेलंगणात ६७, तर महाराष्ट्रात शंभरहून अधिक नगरसेवक…

मुंबई : ‘एमआयएम’ या पक्षाचे आता तेलंगणापेक्षा महाराष्ट्रात अधिक नगरसेवक आहेत. तेलंगणामध्ये केवळ ६७ नगरसेवक