आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. हे वादळ उत्तर-उत्तर पश्चिम भागाच्या दिशेने वेगाने येत आहे. पुढील २४ ते ४८ तासांत हे वादळ गुजरातच्या सीमेला धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या खाडीमध्ये हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. हे वादळ गुजरात खाडीच्या दिशेने वेगाने येत असल्याची माहिती भारतीय हवामान विभागान दिली.


चक्रीवादळ गुरुवारी रात्री ओडिशा व आंध्र प्रदेशची खाडी पार करेल. ७५ किमी प्रति तास वेगाने हवा वाहत आहे. ३ ऑक्टोबर रोजी चक्रीवादळ कमकुवत होऊ शकते आणि हवेचा वेग कमी होऊ ५५ किमी प्रति तास इतकी होईल. चक्रीवादळ पुढील पाच दिवस १२ पेक्षा जास्त राज्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे.



ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगढ, बिहार, पूर्व मध्य प्रदेश व पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. गुरुवारी सकाळपासून ओडिशामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी रात्री चक्रीवादळ ओडिशाची खाडी पार करून आंध्र प्रदेशमधील गोपालपूरमध्ये धडकेल. ओडिशा व आंध्र प्रदेशमधील समुद्रात अथवा किनाऱ्यावर जाणे टाळावे, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली:

दर्शनबंद! केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे बंद करणार!

डेहराडून : बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५६ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तर

..तर पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून टाकू - राजनाथ सिंह

जयपूर : पाकिस्तानने जर सर क्रीक परिसरात कोणतीही आक्रमकता दाखवली तर त्याचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला जाईल, असे