..तर पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून टाकू - राजनाथ सिंह


जयपूर : पाकिस्तानने जर सर क्रीक परिसरात कोणतीही आक्रमकता दाखवली तर त्याचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला जाईल, असे केंद्रीय रक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी गुरुवारी (२ ऑक्टोबर) विजयादशमीच्या निमित्ताने पुनःएकदा पाकिस्तानला इशारा दिला. राजनाथ सिंग यांनी विजयादशमीच्या समारंभासाठी गुजरातमधील कच्छच्या शस्त्रपूजन कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी ते सैनिकांना संबोधित करताना बोलत होते.


राजनाथ सिंह म्हणाले, “स्वातंत्र्य प्राप्त झालेले ७८ वर्षे उलटून गेली तरीही सर क्रीकच्या भागात सीमेचा वाद कायम ठेवला जातो. भारताने अनेकदा संवादाच्या माध्यमातून याचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे, पण पाकिस्तानचे हेतू शुद्ध नाही. पाकिस्तानी लष्कराने अलीकडेच सर क्रीकला लागून असलेल्या भागात ज्या पद्धतीने आपल्या लष्करी पायाभूत सुविधांचा विस्तार केला आहे, त्यावरून त्यांचे हेतू स्पष्ट होतात.”


पुढे ते म्हणाले की,“भारताच्या सीमांचे रक्षण भारतीय सैन्य आणि बीएसएफ मिळून दक्षतेने व तत्परतेने करत आहेत. जर सर क्रीक परिसरात पाकिस्तानकडून कोणतीही आक्रमकता झाली तर याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून टाकले जातील. पाकिस्तानाने हे लक्षात ठेवावे की कराचीकडे जाणाऱ्या मार्गाचा एक भाग क्रीकमधून जातो.”


राजनाथ सिंह म्हणाले कि, “ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान पाकिस्तानने लेहपासून सर क्रीकपर्यंतच्या भागात भारताच्या संरक्षण यंत्रणेत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, पण भारतीय सैन्याने प्रत्युत्तरात पाकिस्तानी हवाई संरक्षण प्रणाली पूर्णपणे उघडकीस आणली आणि असा संदेश दिला की भारतीय सैन्य कितीही चांगले असले तरी ते कुठेही असले तरी ते पाकिस्तानचे मोठे नुकसान करेल.”


Comments
Add Comment

नववर्षाच्या पार्टीतून थेट हत्येपर्यंत; खर्चाच्या भीतीने दोन मित्रांनी तरुणाचा घेतला जीव

बंगळुरु : कर्नाटकातील रामनगर परिसरात घडलेला तरुणाचा संशयास्पद मृत्यूचा अखेर उलघडा झाला. पोलिस तपासात समोर

Republic day parade: यंदा कर्तव्यपथावर अवतरणार गणपती बाप्पा

नवी दिल्ली : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर यंदा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख ठळकपणे दिसणार आहे.

Pension Scheme India : पेन्शनधारकांना सरकारने दिलयं मोठ गिफ्ट..नक्की काय ?

Pension Scheme India: केंद्र सरकारने पेन्शनधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेत अटल पेन्शन योजनेचा वेळ वाढवण्याची मंजुरी दिली

Plane Crash News : हवेतच विमानाचे नियंत्रण सुटले अन् दोन्ही वैमानिकांचा...प्रयागराजमध्ये भीषण अपघात

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात आज दुपारी भारतीय वायू सेनेच्या एका प्रशिक्षणार्थी विमानाला

Devendra Fadnavis at Davos : महाराष्ट्राची दावोसमध्ये ऐतिहासिक भरारी; 'थर्ड मुंबई' प्रकल्पासाठी ११ जागतिक कंपन्यांसोबत सामंजस्य करार

दावोस : जागतिक आर्थिक परिषदेत (WEF 2026) महाराष्ट्र सरकारने राज्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड

भारत - यूएई करारांवर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांचा भारताचा अल्पकालीन