..तर पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून टाकू - राजनाथ सिंह


जयपूर : पाकिस्तानने जर सर क्रीक परिसरात कोणतीही आक्रमकता दाखवली तर त्याचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला जाईल, असे केंद्रीय रक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी गुरुवारी (२ ऑक्टोबर) विजयादशमीच्या निमित्ताने पुनःएकदा पाकिस्तानला इशारा दिला. राजनाथ सिंग यांनी विजयादशमीच्या समारंभासाठी गुजरातमधील कच्छच्या शस्त्रपूजन कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी ते सैनिकांना संबोधित करताना बोलत होते.


राजनाथ सिंह म्हणाले, “स्वातंत्र्य प्राप्त झालेले ७८ वर्षे उलटून गेली तरीही सर क्रीकच्या भागात सीमेचा वाद कायम ठेवला जातो. भारताने अनेकदा संवादाच्या माध्यमातून याचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे, पण पाकिस्तानचे हेतू शुद्ध नाही. पाकिस्तानी लष्कराने अलीकडेच सर क्रीकला लागून असलेल्या भागात ज्या पद्धतीने आपल्या लष्करी पायाभूत सुविधांचा विस्तार केला आहे, त्यावरून त्यांचे हेतू स्पष्ट होतात.”


पुढे ते म्हणाले की,“भारताच्या सीमांचे रक्षण भारतीय सैन्य आणि बीएसएफ मिळून दक्षतेने व तत्परतेने करत आहेत. जर सर क्रीक परिसरात पाकिस्तानकडून कोणतीही आक्रमकता झाली तर याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून टाकले जातील. पाकिस्तानाने हे लक्षात ठेवावे की कराचीकडे जाणाऱ्या मार्गाचा एक भाग क्रीकमधून जातो.”


राजनाथ सिंह म्हणाले कि, “ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान पाकिस्तानने लेहपासून सर क्रीकपर्यंतच्या भागात भारताच्या संरक्षण यंत्रणेत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, पण भारतीय सैन्याने प्रत्युत्तरात पाकिस्तानी हवाई संरक्षण प्रणाली पूर्णपणे उघडकीस आणली आणि असा संदेश दिला की भारतीय सैन्य कितीही चांगले असले तरी ते कुठेही असले तरी ते पाकिस्तानचे मोठे नुकसान करेल.”


Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव