..तर पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून टाकू - राजनाथ सिंह


जयपूर : पाकिस्तानने जर सर क्रीक परिसरात कोणतीही आक्रमकता दाखवली तर त्याचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला जाईल, असे केंद्रीय रक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी गुरुवारी (२ ऑक्टोबर) विजयादशमीच्या निमित्ताने पुनःएकदा पाकिस्तानला इशारा दिला. राजनाथ सिंग यांनी विजयादशमीच्या समारंभासाठी गुजरातमधील कच्छच्या शस्त्रपूजन कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी ते सैनिकांना संबोधित करताना बोलत होते.


राजनाथ सिंह म्हणाले, “स्वातंत्र्य प्राप्त झालेले ७८ वर्षे उलटून गेली तरीही सर क्रीकच्या भागात सीमेचा वाद कायम ठेवला जातो. भारताने अनेकदा संवादाच्या माध्यमातून याचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे, पण पाकिस्तानचे हेतू शुद्ध नाही. पाकिस्तानी लष्कराने अलीकडेच सर क्रीकला लागून असलेल्या भागात ज्या पद्धतीने आपल्या लष्करी पायाभूत सुविधांचा विस्तार केला आहे, त्यावरून त्यांचे हेतू स्पष्ट होतात.”


पुढे ते म्हणाले की,“भारताच्या सीमांचे रक्षण भारतीय सैन्य आणि बीएसएफ मिळून दक्षतेने व तत्परतेने करत आहेत. जर सर क्रीक परिसरात पाकिस्तानकडून कोणतीही आक्रमकता झाली तर याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून टाकले जातील. पाकिस्तानाने हे लक्षात ठेवावे की कराचीकडे जाणाऱ्या मार्गाचा एक भाग क्रीकमधून जातो.”


राजनाथ सिंह म्हणाले कि, “ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान पाकिस्तानने लेहपासून सर क्रीकपर्यंतच्या भागात भारताच्या संरक्षण यंत्रणेत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, पण भारतीय सैन्याने प्रत्युत्तरात पाकिस्तानी हवाई संरक्षण प्रणाली पूर्णपणे उघडकीस आणली आणि असा संदेश दिला की भारतीय सैन्य कितीही चांगले असले तरी ते कुठेही असले तरी ते पाकिस्तानचे मोठे नुकसान करेल.”


Comments
Add Comment

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या