तब्बल १५ वर्षांपासून महिला होती त्रस्त, महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी कायमची केली त्रासातून मुक्तता ..

मुंबई (खास प्रतिनिधी) : रजोनिवृत्तीनंतरच्या रक्तस्त्रावाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्य ६५ वर्षीय महिलेवर अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मागील मागील १५ वर्षांपासून ही महिला समस्येमुळे त्रस्त होती. या महिलेवर कांदिवलीतील महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. येथील डॉक्टरांच्या चमुने या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यामुळे मागील १५ वर्षांच्या मोठ्या त्रासातून या महिलेला मुक्ती मिळाली आहे.


रजोनिवृत्तीनंतरच्या रक्तस्त्रावाच्या समस्येमुळे ही महिला त्रस्त होती. या समस्येवर सोनोग्राफी आणि एमआरआय आदी चाचण्या करून उपचारासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय कांदिवलीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी घेतला. मधुमेह आणि उच्चरक्तदाब विकार असणाऱ्या या महिला रुग्णावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करणे हे वैद्यकीयदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक होते.


हे आव्हान येथील डॉक्टरांनी यशस्वीपणे पेलले. ही शस्त्रक्रिया करताना घेण्यात आलेल्या दक्षतेमुळे रक्तस्त्राव कमी झाला. या शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च अधिक होता. मात्र, रुग्ण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील होता. त्यामुळे शासकीय योजनेचा लाभ मिळवून देत रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.


शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनामार्फत सांगण्यात आले.

Comments
Add Comment

पाण्याची गळती आणि दुषित पाणी समस्येवर लक्ष द्या, आयुक्तांचे जल अभियंता विभागाला निर्देश

मुंबई : मुंबई उत्तर मुंबईतील पाण्याच्या समस्येबाबत महापालिका आयुक्तांसोबतच लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. या

मुंबई आशियातील 'आनंदी' शहर!

टाइम आऊट सर्वेक्षणात पहिले स्थान; ८७% नागरिक खूश नवी दिल्ली: मुंबईला २०२५ साठी आशियातील सर्वात आनंदी शहर म्हणून

गोराईत उभारले जाणार भारतातील पहिले मॅग्रोव्ह पार्क

उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांच्या पुढाकाराने साकारणार प्रकल्प मुंबई : भारतातील पहिले ‘मॅंग्रोव्ह-थीम

अमिताभ बच्चन यांनी विकले २ आलिशान फ्लॅट्स; १२ कोटींना झाला व्यवहार

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील गोरेगाव येथे असलेले त्यांचे दोन लक्झरी फ्लॅट्स विकले

मुंबई महापालिकेचे प्रभाग आरक्षण सोडत ११ नोव्हेंबर रोजी वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरात

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडतीचा कार्यक्रम जाहीर

मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलने ५ जणांना चिरडले!

मस्जीद बंदर रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना, रेल्वे कर्मचा-यांच्या आंदोलनाने घेतले बळी, दोष कुणाचा? मुंबई :