IND vs PAK : महिला क्रिकेट संघही पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करणार नाही

नवी दिल्ली : दुबईतील आशिया कप दरम्यान भारतीय पुरुष क्रिकेट संघाप्रमाणे ५ ऑक्टोबर रोजी कोलंबो येथे होणाऱ्या महिला विश्वचषक सामन्यादरम्यान हरमनप्रीत कौर आणि तिचा संघही पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करणार नाही.

भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंध सर्वात वाईट स्थितीत आहेत. बोर्ड सरकारच्या सूचनांचे पालन करेल आणि नाणेफेकीच्यावेळी हस्तांदोलन होणार नाही. मॅच रेफ्रीशी फोटोशूट होणार नाही आणि सामन्याच्या शेवटी हस्तांदोलन करण्यात येणार नाही.महिला संघही पुरुष संघाने स्वीकारलेल्या धोरणाचे पालन करेल. कोलंबोमधील टॉसवरही बारकाईने लक्ष ठेवले जाईल. हे एखाद्या माजी क्रिकेटपटू किंवा तटस्थ देशातील तज्ञाकडून केले जाईल अशी अपेक्षा आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. टीम इंडियाने डीएलएस पद्धतीने श्रीलंकेचा ५९ धावांनी पराभव केला. ४७ षटकांच्या या सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर २७० धावांचे लक्ष्य ठेवले. पण श्रीलंकेचा संघ ४५.४ षटकांत २११ धावांवर सर्वबाद झाला. भारतीय महिला संघाने हा विश्वचषक कधीही जिंकलेला नाही आणि अशा परिस्थितीत हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील संघाला त्यांच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे आव्हान असणार आहे.

Comments
Add Comment

BRICS : ब्रिक्स देशांच्या क्रीडामंत्र्यांचे संयुक्त घोषणापत्र

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे ब्रिक्स क्रीडा संयुक्त घ

Karn Sharma : कर्ण शर्माची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू कर्ण शर्माने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. यूपी टी२० लीग

Colombo Test : कोलंबो कसोटीत पहिल्या दिवशी भारताची त्रिशतकी मजल, पडिक्कलचे शतक आणि गिलचे अर्धशतक

कोलंबो : देवदत्त पडिक्कलच्या सलग दुसऱ्या कसोटी शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या

Shubman Gill : शुभमन गिलच्या कसोटी क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण

कोलंबो : भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार,

AUS vs BAN : मिचेल स्टार्कची कमाल, ऑस्ट्रेलियाने मॅके कसोटी एक डाव आणि ५१ धावांनी जिंकली

मॅके : मिचेल स्टार्कने घेतलेल्या एकूण १० बळींच्या (मॅचमधील दोन्ही डावांत मिळून) जोरावर ऑस्ट्रेलियाने

Ind vs SL 2nd Test Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालला बाद केल्यानंतर मैदानातच राडा; फर्नांडोसोबत जोरदार बाचाबाची

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच सत्रात मैदानावरील वातावरण चांगलेच