UPI UPDATE : UPI वरून 'Collect Request' बंद ,जाणून घ्या नवीन नियम !

मुंबई : UPI वापरकर्त्यांसाठी एका महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही Google Pay, PhonePe, Paytm किंवा इतर कोणतेही UPI ॲप वापरत असाल, तर हे नवीन नियम लक्षात ठेवा. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI च्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आजपासून, P2P 'कलेक्ट रिक्वेस्ट' किंवा 'पुल ट्रान्झॅक्शन' नावाचे फीचर बंद केले आहेत. म्हणजे तुम्ही कोणालाही पैसे मागण्यासाठी रिक्वेस्ट पाठवू शकणार नाही.



नवीन कायदा काय सांगतो?


NPCI ने सर्व बँका आणि पेमेंट ॲप्सना आदेश दिला आहे की १ ऑक्टोबर २०२५ पासून P2P कलेक्ट रिक्वेस्ट फीचर बंद करावे. या तारखेपासून कोणतीही पेमेंट रिक्वेस्ट पाठवणे किंवा स्वीकारणे शक्य होणार नाही. हा बदल वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी आणि ऑनलाईन फसवणूक कमी करण्यासाठी करण्यात आला आहे.



हे नियम का लागू करत आहेत?


या फीचरचा फसवणुकीसाठी चुकीचा वापर अनेकदा केला जात होता. काही लोक फसवणूक करण्यासाठी लोकांना पैसे मागण्याच्या विनंती पाठवत होते, ज्यामुळे लोकांना नुकसान होत असे. या नियमांमुळे सायबर गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी मदत होणार आहे.


आता, तुम्हाला जर कोणाकडून पैसे घ्यायचे असतील, तर तुम्ही कलेक्ट रिक्वेस्ट पाठवू शकणार नाही. पैसे मागण्यासाठी थेट पैसे पाठवण्याचा मार्ग स्वीकारावा लागेल, म्हणजे तुम्हाला 'पुश ट्रान्झॅक्शन' करावे लागेल. तुम्ही QR कोड स्कॅन करून, UPI ID वापरून किंवा बँक अकाउंट नंबरद्वारे पैसे देणे सुरू ठेवू शकता. या सुविधा पूर्ववत राहतील.


सर्व बँका आणि पेमेंट ॲप्स या बदलांनुसार आपली सिस्टीम अपडेट करत आहेत. म्हणून तुमचे ॲप्स वेळोवेळी अपडेट करत राहा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून येणाऱ्या कलेक्ट रिक्वेस्टला मंजुरी देऊ नका. NPCI ने हा निर्णय युजर्सच्या सुरक्षिततेसाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी घेतलेला एक महत्त्वाचा उपाय आहे.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता