UPI UPDATE : UPI वरून 'Collect Request' बंद ,जाणून घ्या नवीन नियम !

मुंबई : UPI वापरकर्त्यांसाठी एका महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही Google Pay, PhonePe, Paytm किंवा इतर कोणतेही UPI ॲप वापरत असाल, तर हे नवीन नियम लक्षात ठेवा. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI च्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आजपासून, P2P 'कलेक्ट रिक्वेस्ट' किंवा 'पुल ट्रान्झॅक्शन' नावाचे फीचर बंद केले आहेत. म्हणजे तुम्ही कोणालाही पैसे मागण्यासाठी रिक्वेस्ट पाठवू शकणार नाही.



नवीन कायदा काय सांगतो?


NPCI ने सर्व बँका आणि पेमेंट ॲप्सना आदेश दिला आहे की १ ऑक्टोबर २०२५ पासून P2P कलेक्ट रिक्वेस्ट फीचर बंद करावे. या तारखेपासून कोणतीही पेमेंट रिक्वेस्ट पाठवणे किंवा स्वीकारणे शक्य होणार नाही. हा बदल वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी आणि ऑनलाईन फसवणूक कमी करण्यासाठी करण्यात आला आहे.



हे नियम का लागू करत आहेत?


या फीचरचा फसवणुकीसाठी चुकीचा वापर अनेकदा केला जात होता. काही लोक फसवणूक करण्यासाठी लोकांना पैसे मागण्याच्या विनंती पाठवत होते, ज्यामुळे लोकांना नुकसान होत असे. या नियमांमुळे सायबर गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी मदत होणार आहे.


आता, तुम्हाला जर कोणाकडून पैसे घ्यायचे असतील, तर तुम्ही कलेक्ट रिक्वेस्ट पाठवू शकणार नाही. पैसे मागण्यासाठी थेट पैसे पाठवण्याचा मार्ग स्वीकारावा लागेल, म्हणजे तुम्हाला 'पुश ट्रान्झॅक्शन' करावे लागेल. तुम्ही QR कोड स्कॅन करून, UPI ID वापरून किंवा बँक अकाउंट नंबरद्वारे पैसे देणे सुरू ठेवू शकता. या सुविधा पूर्ववत राहतील.


सर्व बँका आणि पेमेंट ॲप्स या बदलांनुसार आपली सिस्टीम अपडेट करत आहेत. म्हणून तुमचे ॲप्स वेळोवेळी अपडेट करत राहा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून येणाऱ्या कलेक्ट रिक्वेस्टला मंजुरी देऊ नका. NPCI ने हा निर्णय युजर्सच्या सुरक्षिततेसाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी घेतलेला एक महत्त्वाचा उपाय आहे.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील