नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘डीजीसीए’कडून परवाना

उद्योजक गौतम अदानी यांच्याकडून पाहणी


नवी मुंबई : नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला (एनएमआयए) नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए)कडून एरोड्रोम परवाना मंजूर झाला आहे. हा परवाना विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. विमान वाहतूक प्राधिकरणाच्या सर्व सुरक्षा आणि नियामक अटी पूर्ण केल्यानंतर हा परवाना देण्यात आला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन येत्या ८ ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मंगळवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उद्योजक गौतम अदानी यांनी विशेष विमानाने येऊन पाहणी केली.


नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आले असून विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.विमान वाहतूक प्राधिकरणाच्या सर्व सुरक्षा व नियामक निकषांचे पालन केल्यानंतर एरोड्रोम परवाना विमानतळाला मंजूर झाला. या परवान्यामुळे विमानतळावर विमान उड्डाणे करणे शक्य होणार आहे. एरोड्रोम परवाना मिळाल्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय दळणवळण सुधारण्याच्या ध्येयाजवळ पोहोचला आहे, असे एनएमआयएने म्हटले आहे.


या विमानतळाच्या पहिल्या टप्प्यापासून व्यावसायिक उड्डाणे सुरू केली जातील असे एअर इंडिया समूहाने नुकतेच जाहीर केले होते, या विमानतळाचे संचालन अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडकडून केले जाणार आहे. प्रारंभीच्या टप्प्यात, एअर इंडिया समूहाची एअर इंडिया एक्स्प्रेस या विमानतळावरून उड्डाणे करणार अाहेत.


नामकरणावरून वाद


विमानतळाला माजी खासदार दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव दिले जावे अशी मागणी भूमिपूत्रांची आहे. त्यासाठी येथे आंदोलनही झाले. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी त्यासाठी मोठ्या आंदोलनाची तयारी केली आहे. त्यामुळे या विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवी मुंबईतील सारसोळे गावाच्या वेशीसमोर नवी मुंबई विमानतळाचा नामफलकावर दि. बा. पाटील यांचे नाव नसल्याने फलक तेथे लावण्यास ग्रामस्थ मनोज मेहेर व त्याच्या सहकाऱ्यांनी विरोध करत नामफलक लावू दिला नाही. नवी मुंबईत सर्वत्र हेच चित्र पाहावयास मिळत आहे. प्रशासनाने फलक लावल्यास ग्रामस्थांकडून ते फेकून दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Mumbai-Ahmedabad Bullet Train : बुलेट ट्रेनच्या कामाला वेग! २१ किमीच्या भुयारी मार्गासाठी घणसोलीत दुसरं महाकाय 'TBM' कटरहेड सज्ज

नवी मुंबई : भारताचे स्वप्न असलेल्या मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल (बुलेट ट्रेन) प्रकल्पाने आता अधिक गती घेतली आहे.

Monsoon Fishing Ban : मत्स्यप्रजननासाठी राज्याच्या सागरी हद्दीत १ जूनपासून यांत्रिक मासेमारीला बंदी; नियम मोडल्यास होणार कडक कारवाई

नवी मुंबई : पावसाळा तोंडावर आला असून, सागरी जीवांच्या प्रजननासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे आणि मत्स्यसंपदेचे

NMMC Declares 504 Buildings Dangerous : नवी मुंबईत ५०४ इमारती 'धोकादायक' घोषित; ५२ अतिधोकादायक इमारती तत्काळ रिकाम्या करण्याचे महापालिकेचे आदेश!

नवी मुंबई : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) संभाव्य दुर्घटना आणि

APMC Market : कलिंगड खाल्ल्याने मृत्यूच्या घटनेचा फटका; वाशी APMC मध्ये कलिंगड विक्री ठप्प! व्यापारी आणि शेतकरी चिंतेत

नवी मुंबई : मुंबईतील पायधुनी परिसरात कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची

मोठी बातमी: विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार, महत्त्वाचे कारण समोर

Maharashtra Vidhan Parishad Election : महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीचे वारे जोरदार रंगात असताना मोठी बातमी समोर आली आहे.

Shivsena : शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 2 उमेदवार जाहीर; बच्चू कडूंसह नीलम गोऱ्हे अर्ज भरणार

Maharashtra Vidhan Parishad Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) करण्यात आली आहे. विधान