नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘डीजीसीए’कडून परवाना

उद्योजक गौतम अदानी यांच्याकडून पाहणी


नवी मुंबई : नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला (एनएमआयए) नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए)कडून एरोड्रोम परवाना मंजूर झाला आहे. हा परवाना विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. विमान वाहतूक प्राधिकरणाच्या सर्व सुरक्षा आणि नियामक अटी पूर्ण केल्यानंतर हा परवाना देण्यात आला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन येत्या ८ ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मंगळवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उद्योजक गौतम अदानी यांनी विशेष विमानाने येऊन पाहणी केली.


नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आले असून विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.विमान वाहतूक प्राधिकरणाच्या सर्व सुरक्षा व नियामक निकषांचे पालन केल्यानंतर एरोड्रोम परवाना विमानतळाला मंजूर झाला. या परवान्यामुळे विमानतळावर विमान उड्डाणे करणे शक्य होणार आहे. एरोड्रोम परवाना मिळाल्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय दळणवळण सुधारण्याच्या ध्येयाजवळ पोहोचला आहे, असे एनएमआयएने म्हटले आहे.


या विमानतळाच्या पहिल्या टप्प्यापासून व्यावसायिक उड्डाणे सुरू केली जातील असे एअर इंडिया समूहाने नुकतेच जाहीर केले होते, या विमानतळाचे संचालन अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडकडून केले जाणार आहे. प्रारंभीच्या टप्प्यात, एअर इंडिया समूहाची एअर इंडिया एक्स्प्रेस या विमानतळावरून उड्डाणे करणार अाहेत.


नामकरणावरून वाद


विमानतळाला माजी खासदार दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव दिले जावे अशी मागणी भूमिपूत्रांची आहे. त्यासाठी येथे आंदोलनही झाले. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी त्यासाठी मोठ्या आंदोलनाची तयारी केली आहे. त्यामुळे या विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवी मुंबईतील सारसोळे गावाच्या वेशीसमोर नवी मुंबई विमानतळाचा नामफलकावर दि. बा. पाटील यांचे नाव नसल्याने फलक तेथे लावण्यास ग्रामस्थ मनोज मेहेर व त्याच्या सहकाऱ्यांनी विरोध करत नामफलक लावू दिला नाही. नवी मुंबईत सर्वत्र हेच चित्र पाहावयास मिळत आहे. प्रशासनाने फलक लावल्यास ग्रामस्थांकडून ते फेकून दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

IND vs BAN : क्रूर पाऊस! ICC महिला विश्वचषकात भारताचा विजय हुकला; बांगलादेश पराभवापासून वाचला, बांगलादेश विरुद्धचा सामना रद्द

नवी मुंबई : आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप २०२५ (ICC Women's ODI World Cup 2025) स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना अखेर पावसामुळे

Navi Mumbai Vashi Fire : नवी मुंबईत दिवाळीच्या रात्री 'अग्नितांडव'! वाशी-कामोठ्यात दोन मोठ्या दुर्घटना; ६ वर्षांच्या चिमुकलीसह चौघांचा बळी, माय-लेकीचाही अंत!

नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी परिसरामध्ये सेक्टर १४ मधील एम. जी. कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडन्सी या निवासी

खारघर, तळोजा परिसरातील जलपुरवठा होणार सुरळीत

सिडकोकडून नागरिकांना िदलासादायक निर्णय खारघर  : खारघर आणि तळोजा परिसरातील वाढत्या पाणीटंचाईच्या

नवी मुंबईतील १३रेल्वे स्थानके म. रे. कडे जाण्याची शक्यता

मध्य रेल्वे (म.रे) मार्गावरील हार्बर मार्गिकेची स्थानकांच्या देखभाल आणि दुरुस्तीवरून सिडको आणि रेल्वे

महावितरणच्या संपाला नवी मुंबईतील ८० टक्के कर्मचाऱ्यांचा पाठिंबा

नवी मुंबई (प्रतिनिधी) : खासगीकरण आणि फेररचनेच्या मुद्द्यांवर संयुक्त कृती समितीने आंदोलन पुकारले आहे. या

मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले. मोदींनी बटण