ICC Womens World Cup : भारतीय संघाची विजयी सलामी

गुवाहाटी : भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषकाची सुरुवात शानदार पद्धतीने केली. पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा ५९ धावांनी पराभव करत भारताने विजयी सलामी दिली आहे. फंलदाजी आणि गोलंदाजीची आपली जादू दाखवणारी दीप्ती शर्मा ही बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने कठीण परिस्थितीतून बाहेर पडून आव्हानात्मक धावसंख्या उभारली. सुरुवातीच्या विकेट गमावल्यानंतर दीप्ती शर्मा (८७ धावा) आणि अमनजोत कौर (५७ धावा) यांनी सातव्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी करून संघाला बळकटी दिली. हरलीन देओल (४८) आणि प्रतीका रावल (३७) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले.

डीएलएस पद्धतीने २७१ धावांचे लक्ष्य ठेवणाऱ्या श्रीलंकेचा संघ ४५.४ षटकांत २११ धावांतच गारद झाला. फक्त कर्णधार चामारी अटापट्टू (४३), निलाक्षी डी सिल्वा (३५) आणि हर्षिता समरविक्रमा (२९) यांनाच काहीसा प्रतिकार करता आला.गोलंदाजीत दीप्ती शर्माने तीन विकेट्स घेतल्या. तर स्नेह राणा आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. इतर गोलंदाजांनी सातत्याने दबाव कायम ठेवला आणि भारताला विजय साकारुन दिला.

Comments
Add Comment

BRICS : ब्रिक्स देशांच्या क्रीडामंत्र्यांचे संयुक्त घोषणापत्र

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे ब्रिक्स क्रीडा संयुक्त घ

Karn Sharma : कर्ण शर्माची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू कर्ण शर्माने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. यूपी टी२० लीग

Colombo Test : कोलंबो कसोटीत पहिल्या दिवशी भारताची त्रिशतकी मजल, पडिक्कलचे शतक आणि गिलचे अर्धशतक

कोलंबो : देवदत्त पडिक्कलच्या सलग दुसऱ्या कसोटी शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या

Shubman Gill : शुभमन गिलच्या कसोटी क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण

कोलंबो : भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार,

AUS vs BAN : मिचेल स्टार्कची कमाल, ऑस्ट्रेलियाने मॅके कसोटी एक डाव आणि ५१ धावांनी जिंकली

मॅके : मिचेल स्टार्कने घेतलेल्या एकूण १० बळींच्या (मॅचमधील दोन्ही डावांत मिळून) जोरावर ऑस्ट्रेलियाने

Ind vs SL 2nd Test Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालला बाद केल्यानंतर मैदानातच राडा; फर्नांडोसोबत जोरदार बाचाबाची

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच सत्रात मैदानावरील वातावरण चांगलेच