'अमेरिकेच्या दबावापोटी यूपीए सरकारने पाकिस्तान विरोधात कारवाई टाळली'


नवी दिल्ली : मुंबईवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला. या मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. मृतांमध्ये भारतीय नागरिकांसह काही परदेशी नागरिकांचाही समावेश होता. हा हल्ला करणारे दहा पैकी नऊ दहशतवादी सुरक्षा पथकांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाले. अजमल कसाब नावाच्या एका दहशतवाद्याला मुंबई पोलिसांनी जीवंत पकडले. कसाबने दिलेल्या माहितीमुळे हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे ठोस पुरावे तपास पथकाला मिळाले. यानंतर पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली होती. पण अमेरिकेच्या प्रचंड दबावापोटी तत्कालीन यूपीए सरकारने पाकिस्तान विरोधात कारवाई टाळली. हा धक्कादायक गौप्यस्फोट देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केला.


हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण होण्याच्या सुमारास पी. चिदंबरम यांनी अमेरिकेच्या दबावामुळेच यूपीए सरकारने पाकिस्तान विरोधातील कारवाई टाळल्याचे सांगितले. एका मुलाखतीत दरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पी. चिदंबरम यांनी गौप्यस्फोट केला. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी हल्ला झाला. या घटनेनंतर काही दिवसांनी पी. चिदंबरम यांनी देशाच्या गृहमंत्रिपदाची शपथ घेतली. हा शपथविधी झाल्यानंतर काही दिवसांतच मेरिकेच्या तत्कालिन परराष्ट्रमंत्री काँडोलिसा राईस भारतात आल्या होत्या. त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि माझी भेट घेतली, असे पी. चिदंबरम यांनी सांगितले.


राईस यांनी भारताने पाकिस्तानवर कोणतीही लष्करी कारवाई करू नये असे सांगितले. या नंतर काँडोलिसा राईस भारतात आणखी काही जणांना भेटून गेल्या. पुढे भारताने पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाई टाळली, असे पी. चिदंबरम म्हणाले. भाजपने पी. चिदंबरम यांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे. पी. चिदंबरम जे काही बोलले ते खूप उशिरा बोलले, या शब्दात भाजपने प्रतिक्रिया दिली.


Comments
Add Comment

भयंकर धक्कादायक! दिवाळीत 'कार्बाइड गन'मुळे १४ मुलांना कायमचे अंधत्व; १२५ हून अधिक जखमी!

भोपाळ : दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचे वेगवेगळे ट्रेंड समोर येत असातात, यामध्ये चकरीपासून ते रॉकेटपर्यंत वेगवेगळे

सैन्यासाठी ७९,००० कोटींचे मोठे निर्णय!

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने आज भारतीय

देशभरात मतदार यादी बनवण्याचे मोठे काम सुरू!

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुडुचेरी, तामिळनाडूत सर्वप्रथम एसआयआर प्रक्रिया नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने देशभरातील

महिला आणि ट्रान्सजेंडरसाठी मोफत प्रवास; काय आहे 'सहेली स्मार्ट कार्ड' योजना?

नवी दिल्ली : भाऊबीजच्या निमित्ताने दिल्ली सरकार महिला आणि ट्रान्सजेंडर लोकांना एक मोठी भेट देणार आहे. आजपासून

तेजस्वी यादव '४२०' आरोपी, त्यांच्याकडे विश्वासार्हताच नाही, बिहारला मोदी-नितीश यांचे 'डबल इंजिन' सरकारच हवे!; रवी शंकर प्रसाद यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप खासदार रवी शंकर प्रसाद यांनी आज महागठबंधनचे

आता विक्रीआधी होणार प्रत्येक औषधाची सखोल तपासणी

नवी दिल्ली : लहान मुलांना खोकला झाल्यावर औषध म्हणून दिल्या जाणाऱ्या कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे मध्य प्रदेशमध्ये २४