VK Karur Stampede : विजय थलापतीला अटक होणार? करूर चेंगराचेंगरी प्रकरणात टीव्हीके जिल्हा सचिवांना बेड्या; पोलिसांची मोठी कारवाई

करूर : अभिनेता आणि तमिलगा वेत्री कळ्ळगम पक्षाचा नेता विजय थलापती एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्या नुकत्याच झालेल्या राजकीय रॅलीमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या दुर्घटनेची तीव्रता खूप मोठी असून, या चेंगराचेंगरीत ४० निष्पाप लोकांचा हकनाक मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत गंभीर असल्याने विजय थलापती आणि त्याच्या पक्षाचे व्यवस्थापन सध्या टीकेचे लक्ष्य ठरले आहे. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी तातडीने आणि कठोर कारवाई केली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणातील सुनावणी मद्रास हायकोर्टाने सध्या पुढे ढकलली आहे. या दुर्घटनेमुळे विजय थलापतीच्या राजकीय कारकिर्दीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, तसेच राजकीय कार्यक्रमांमध्ये गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्याच्या आवश्यकतेवर या घटनेने पुन्हा एकदा बोट ठेवले आहे.



टीव्हीके जिल्हा सचिवांना अटक; विजय थलापती वादात


अभिनेता आणि तमिलगा वेत्री कळ्ळगम (TVK) पक्षाचा नेता विजय थलापती (Vijay Thalapathy) याच्या राजकीय रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. करूर येथे झालेल्या या भीषण दुर्घटनेत ४१ जणांचा हकनाक मृत्यू झाला होता, तर अनेक नागरिक जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी टीव्हीके पक्षाच्या जिल्हा सचिवांना अटक केली आहे. या प्रकरणात पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २७ सप्टेंबर रोजी झालेल्या या रॅलीत चेंगराचेंगरी झाली, तेव्हा विजय थलापती यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. विजय आपल्या सभेसाठी जाणूनबुजून उशिरा आले असल्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन बिघडले आणि ही दुर्घटना घडली, असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, टीव्हीके पक्षाला कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम किंवा रॅली आयोजित करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारी एक याचिका मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार होती, मात्र न्यायालयाने ती सुनावणी सध्या रद्द केली आहे. या प्रकरणामुळे विजय थलापती आणि त्यांच्या पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या