सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे, यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या विनंती वजा आग्रहामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २३ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.


मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कणकवली आणि सावंतवाडी कार्यकारी अभियंत्यांना खड्डे बुजवण्यासाठी व रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी परिपूर्ण अहवाल देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या अहवालानुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडून २३ कोटी ७८ लाख रुपये इतका निधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी मंजूर करून घेतला आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी १५ मेपासून पाऊस सुरू झाला. साडेचार महिने सातत्याने पाऊस पडत आहे. अजूनही एक महिना पाऊस पडण्याची
शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यांची नादुरुस्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे. अनेक रस्त्यांवर खड्डे निर्माण झाल्यामुळे हे खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी यापूर्वीच्या बैठकीत सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांना तशा पद्धतीचे अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकामाच्या ८८ रस्त्यांसाठी हा निधी प्राप्त झालेला आहे.


पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी भरघोस असा निधी सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिलेला असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा खड्डेमुक्त होईल, असा विश्वास निर्माण झाला आहे.

Comments
Add Comment

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक