कर्जत यार्ड आधुनिकीकरणासाठी मध्य रेल्वेचा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेने कर्जत स्थानकावर यार्ड पुनर्रचना आणि आधुनिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारणीचे काम हाती घेतले आहे. यासाठी प्री नॉन-इंटरलॉकिंग कामाची आवश्यकता असल्याने १० ऑक्टोबरपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक्स घेण्यात येणार आहेत.


या ब्लॉक दरम्यान १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.२० ते संध्याकाळी ५.२० वाजेपर्यंत तर २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत कर्जत परिसरातील गाड्यांची वाहतूक विस्कळीत राहणार आहे. हा ब्लॉक भिवपुरी स्थानक, जांब्रुंग केबिन, ठाकूरवाडी, नागनाथ केबिन ते कर्जत या संपूर्ण विभागात लागू राहणार आहे.


या दोन दिवसांत कर्जत-खोपोली दरम्यान अप आणि डाउन लोकल गाड्यांची सेवा पूर्णपणे ठप्प राहणार आहे. तसेच कर्जत-सीएसएमटी लोकल गाड्या काही वेळा नेरळ किंवा अंबरनाथ येथेच थांबवल्या जाणार आहेत. जोधपूर-हडपसर एक्स्प्रेस, सीएसएमटी-भुवनेश्वर एक्स्प्रेस, सीएसएमटी-हैदराबाद एक्स्प्रेस, बिकानेर-यशवंतपूर एक्स्प्रेस, तसेच पनवेल-नांदेड एक्स्प्रेस यांसारख्या गाड्या भिवंडी, भिवपुरी रोड, नेरळ, वांगणी आणि चौक येथे नियमन करण्यात येणार आहेत. यामुळे काही गाड्या १५ ते २० मिनिटांनी उशिराने धावतील.


२ ऑक्टोबरलाही काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर नेरळ, अंबरनाथ आणि ठाणे येथून गाड्यांचे शॉर्ट ओरिजिनेशन व टर्मिनेशन केले जाणार आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कर्जत यार्डचे आधुनिकीकरण ही एक मोठी योजना आहे. जुन्या पद्धतीच्या इंटरलॉकिंग सिस्टीमऐवजी आधुनिक प्रणाली बसवली जात आहे. कर्जत हे एक महत्त्वाचे जंक्शन असून, पुणे, खोपोली, लोणावळा आणि मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी हे केंद्रबिंदूचे स्थानक आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, या दोन दिवसांमध्ये गाड्यांच्या वेळापत्रकात होणाऱ्या बदलांची नोंद घ्यावी आणि त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या दिवशी मुंबईच्या वाहतूक मार्गांमध्ये बदल, या रस्त्यांवर No Entry

मुंबई : दसऱ्याच्या दिवशी मुंबईत शिवसेनेचा मेळावा असतो. यंदा परंपरेनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव

Mumbai Metro : मुंबई मेट्रो लाईन ६ प्रकल्पात नियोजनाचा अभाव; MMRDA वर उभारलेले खांब तोडण्याची वेळ

मुंबई : स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या मेट्रो लाईन ६ प्रकल्पात मुंबई महानगर प्रदेश

जिंकण्याची खात्री असलेल्या जागाच लढवणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई महापालिका निवडणुकीबाबत वक्तव्य मुंबई : ज्या जागांवर विजयाची खात्री आहे,

‘दसरा मेळाव्याबाबत विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा’

मुंबई : सर्व मंत्र्यांनी दौरे केले. शेतकऱ्यांचा रोष, नाराजी, राग, विरोध पाहायला मिळाला. जेव्हा घरदार उध्वस्त होते.

राज्यातील ७५ हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देणार, रोजगार इच्छुक तरुणांना संधी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे होणार

12th Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही आहे महत्त्वाची बातमी...

अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे बारावी परीक्षा अर्ज भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मुंबई : राज्यात होत असलेली