'राज्यातले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे का हे तपासणार'


यवतमाळ : लोकसभा निवडणुकीआधी राज्यातले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला. आता राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका होण्याआधीच राज्यातले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे का हे तपासणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोटला येथे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दगडफेक झाली. रास्ता रोको करुन दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.



राज्यात वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी जातीवरुन किंवा धर्मावरुन तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ताजी अहिल्यानगरमधील घटना ही अशाच स्वरुपाची असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पोलीस तपास करू आणि नंतर योग्य ती कारवाई करू असे स्पष्ट संकेत दिले आहेत.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना पत्रकारांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील घटनेबाबत प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना प्रवासात होतो त्यामुळे सविस्तर माहिती नाही. मी माहिती घेऊन नंतर बोलेन, पण आतापर्यंत जे कळले आहे त्यानंतर तपास सुरू करण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यातले वातावरण हेतूपुरस्सर बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे का ? याचाही तपास करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत.


याआधी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोटला येथे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दगडफेक झाली. रास्ता रोको करुन दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. पोलीस कारवाईनंतर परिस्थिती नियंत्रणात आली.


Comments
Add Comment

Dadar Tree Collapse : दादरमध्ये भलंमोठं झाड कोसळलं! प्लाझाजवळ पार्क केलेल्या कारचा चक्काचूर; अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये गेल्या

BMC Park : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! महापालिकेची सर्व उद्याने उद्या बंद राहणार; जोरदार वारे आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

Nashik TCS Case Nida Khan : नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील संशयित निदा खानला जामीन

Nashik : नाशिकमधील टीसीएस कंपनीत कार्यरत असलेल्या एका अविवाहित तरुणीवर अत्याचार तसेच जबरदस्तीने धर्मांतराचा

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या