'राज्यातले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे का हे तपासणार'


यवतमाळ : लोकसभा निवडणुकीआधी राज्यातले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला. आता राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका होण्याआधीच राज्यातले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे का हे तपासणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोटला येथे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दगडफेक झाली. रास्ता रोको करुन दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.


https://www.youtube.com/live/iK-_GeR91W4

राज्यात वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी जातीवरुन किंवा धर्मावरुन तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ताजी अहिल्यानगरमधील घटना ही अशाच स्वरुपाची असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पोलीस तपास करू आणि नंतर योग्य ती कारवाई करू असे स्पष्ट संकेत दिले आहेत.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना पत्रकारांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील घटनेबाबत प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना प्रवासात होतो त्यामुळे सविस्तर माहिती नाही. मी माहिती घेऊन नंतर बोलेन, पण आतापर्यंत जे कळले आहे त्यानंतर तपास सुरू करण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यातले वातावरण हेतूपुरस्सर बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे का ? याचाही तपास करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत.


याआधी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोटला येथे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दगडफेक झाली. रास्ता रोको करुन दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. पोलीस कारवाईनंतर परिस्थिती नियंत्रणात आली.


Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान वाहतूक सुरू, पहिल्या विमानाचं जोरदार स्वागत

पनवेल : रायगड जिल्ह्यात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून (गुरुवार २५ डिसेंबर २०२५)

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा