'राज्यातले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे का हे तपासणार'


यवतमाळ : लोकसभा निवडणुकीआधी राज्यातले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला. आता राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका होण्याआधीच राज्यातले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे का हे तपासणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोटला येथे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दगडफेक झाली. रास्ता रोको करुन दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.


https://www.youtube.com/live/iK-_GeR91W4

राज्यात वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी जातीवरुन किंवा धर्मावरुन तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ताजी अहिल्यानगरमधील घटना ही अशाच स्वरुपाची असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पोलीस तपास करू आणि नंतर योग्य ती कारवाई करू असे स्पष्ट संकेत दिले आहेत.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना पत्रकारांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील घटनेबाबत प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना प्रवासात होतो त्यामुळे सविस्तर माहिती नाही. मी माहिती घेऊन नंतर बोलेन, पण आतापर्यंत जे कळले आहे त्यानंतर तपास सुरू करण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यातले वातावरण हेतूपुरस्सर बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे का ? याचाही तपास करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत.


याआधी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोटला येथे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दगडफेक झाली. रास्ता रोको करुन दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. पोलीस कारवाईनंतर परिस्थिती नियंत्रणात आली.


Comments
Add Comment

Modi and Persian scripts : राज्यात मोडी व फारसी लिपी प्रचार-प्रसारासाठी वार्षिक पुरस्कार - मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व प्रशासकीय वारशाचे जतन करण्यासाठी राज्य शासनाने मोडी व फारसी

ShivendraRaje Bhonsle : मुंबई-गोवा महामार्गाचे 'मे' अखेरपर्यंत काम पूर्णत्वास; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे विधानपरिषदेत आश्वासन

मुंबई : दरवर्षी होळी आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या

Banjara Reservation : बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी अभ्यास समितीची स्थापना

मुंबई : मराठा आरक्षणासाठी ‘हैदराबाद गॅझेट’चा आधार घेतल्यानंतर, आता त्याच धर्तीवर बंजारा समाजाला अनुसूचित जमाती

Niranjan Davkhare : मुंबई-ठाणेकरांचा मेट्रो प्रवास लवकरच सुसाट! 'मेट्रो-४' प्रकल्पाच्या टप्प्याटप्प्याने उद्घाटनाचे सरकारचे नियोजन

मुंबई : मुंबई आणि ठाणे या जोडशहरांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करणाऱ्या 'मेट्रो-४' (ग्रीन लाईन) प्रकल्पाचे काम

Budget Session : कापूस खरेदीची मुदत १५ मार्चपर्यंत वाढविली

मुंबई : राज्यातील कापूस खरेदीची मुदत वाढवण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. या अनुषंगाने पणन

Madhuri Misal : भटक्या श्वानांच्या उपद्रवावर राज्य सरकार मोठं पाऊल उचलणार; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची सभागृहात घोषणा

शिक्षण संस्थांच्या सुरक्षिततेसाठी 'नोडल अधिकारी' नेमणार मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या