तामिळनाडू चेंगराचेंगरी : नड्डांकडून एनडीए शिष्टमंडळ स्थापन, श्रीकांत शिंदेंचाही समावेश

नवी दिल्ली : तामिळनाडूच्या करूरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच जखमींना लवकर बरे वाटावेे, यासाठी प्रार्थनाही केली आहे. दरम्यान नड्डा यांनी सदर दुर्घटनेमागील कारणे जाणून घेण्यासाठी भाजपा खासदार हेमा मालिनी यांच्या नेतृत्वात आठ खासदारांची चौकशी समिती स्थापन केली आहे. यात अनुराग ठाकूर, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, तेजस्वी सूर्या, ब्रज लाल (माजी पोलीस महासंचालक), अपराजिता सारंगी, रेखा शर्मा आणि पुत्ता महेश कुमार यांचा समावेश आहे. एनडीए खासदारांचे हे शिष्टमंडळ करूरला भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांचीही भेट घेणार आहे. तसेच चौकशीनंतर अहवालही सादर करणार आहे.


करूर शहरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय यांची जाहीर सभा होती. या सभेसाठी पन्नास हजारांपेक्षा जास्त लोक जमले होते. गर्दी खूप जास्त असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. मिळालेल्या माहितीनुसार, अचानक काहीतरी गोंधळ झाल्याने लोकांमध्ये भीती पसरली आणि चेंगराचेंगरी सुरू झाली. या चेंगराचेंगरीत ४० जणांचा मृत्यू झाला.


अनेक लोक एकमेकांवर आदळले आणि गुदमरून जमिनीवर पडले. ही घटना घडल्यानंतर विजय यांनी तात्काळ आपले भाषण थांबवले आणि लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले. पोलिसांनी आणि स्थानिक लोकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.


आयोजकांनी अंदाजे १०,००० लोकांसाठी मैदानात व्यवस्था केली होती, परंतु प्रत्यक्षात अपेक्षेपेक्षा तीन पटीने अधिक लोक या रॅलीसाठी जमले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, ही रॅली दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत नियोजित असताना, लोक शनिवारी सकाळी ११ वाजेपासूनच मैदानात जमायला सुरुवात झाली होती. पोलीस अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, "विजय जेव्हा सायंकाळी ७:४० वाजता पोहोचले, तेव्हा गर्दी अनेक तास पुरेसे अन्न आणि पाण्याशिवाय वाट पाहत होती. हीच खरी परिस्थिती होती."


आयोजनातील त्रुटी, अपुऱ्या व्यवस्था आणि अभिनेत्याच्या येण्यास झालेला विलंब यामुळे ही चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. अशा राजकीय कार्यक्रमांमध्ये गर्दीचे व्यवस्थापन आणि वेळेचे नियोजन किती महत्त्वाचे आहे, हे या दुर्दैवी घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी