रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी एकमेकांकडे बोट

पालिका, बांधकाम विभागाने जबाबदारी झटकली


विरार : रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे नुकतेच विरारमध्ये एका व्यक्तीचा बळी गेला आहे. यापूर्वी सुद्धा असे अपघात घडले असून, रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरले असून, पालिकाच यासाठी जबाबदार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे ही दोन्ही कार्यालये एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने योग्य न्याय मिळावा यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहे.


विरार प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर गॅस वाहिनी अंथरण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या कामादरम्यान अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात याच मार्गावरील खड्ड्यात अडखळून प्रताप नाईक हे रस्त्यावर पडले होते. याचवेळी मागून आलेल्या भरधाव टँकरखाली चिरडून त्यांचा मृत्यू झाला होता. मागील पाच वर्षांत या रस्त्यावर अशाच पद्धतीच्या असंख्य अपघातांत निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावलेले आहेत. त्यामुळे यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने केली. आणि आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.


दरम्यान, या रस्त्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने गुजरात महानगर गॅस कंपनीला भूमिगत गॅसवाहिनी टाकण्याची परवानगी दिली आहे. या कामाकरीता कंपनीकडून ३ कोटी ५८ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमीनभाडे व परतावा रक्कम घेण्यात आली आहे. दुसरीकडे महापालिकेनेही त्यांच्या अमृत योजनेतील जलवाहिनी अंथरण्याच्या कामासाठी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदकाम केलेले आहे. विशेष म्हणजे खोदलेला रस्ता दुरुस्तीचे काम महापालिकाच करत आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा रस्ता वसई-विरार महापालिका हद्दीत येत असल्याने व गुजरात महानगर गॅस कंपनीच्या कामामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा ठपका ठेवून, पालिकेने याबाबत बांधकाम विभागाला पत्र दिलेली आहेत. बांधकाम विभागाने सुद्धा गुजरात महानगर गॅस कंपनीसोबत केलेल्या करारनाम्यानुसार काम करून घेतलेले नाही. त्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांसाठीची जबाबदारी झटकण्याचे काम शासनाकडून करण्यात येत आहे.


सार्वजनिक बांधकाम विभाग, वसई-विरार महापालिका, आरटीओ आणि वाहतूक पोलीस यांच्यासह गुजरात महानगर गॅस कंपनी हे सर्वच या अपघातांना जबाबदार आहेत. त्यामुळे हा लढा मानवाधिकार आयोग व जनहित याचिकेच्या माध्यमातून पुढे नेण्याचा निर्णय माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने घेतला आहे.
- ॲॅड. महेश कदम, जिल्हाध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ.

Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक