मुंबईच्या सिद्धिविनायक ट्रस्टकडून पूरग्रस्तांना १० कोटींची मदत


मुंबई : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. लाखो हेक्टर शेती वाहून गेली आहे. अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मुलांचे शालेय साहित्य वाहून गेले आहे. पूरग्रस्तांना पुन्हा उभं करण्यासाठी राज्य शासन आणि अनेक स्वयंसेवी संस्था सरसावल्या आहेत. या उपक्रमात आता मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर पण सहभागी झाले आहे. मुंबईच्या सिद्धिविनायक ट्रस्टने पूरग्रस्तांना १० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.


याआधी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडून मंदिर जाहीर झाली. तसेच शिर्डीच्या साईबाबा मंदिर संस्थानकडूनही मदत जाहीर झाली. शेगावच्या गजानन महाराज मंदिर ट्र्स्टकडून मदत जाहीर झाली. यानंतर आता मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून मदत जाहीर झाली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पण पूरग्रस्तांना मदत जाहीर केली आहे.


मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून राज्यातील पूरग्रस्तांना १० कोटी रुपयांची मदत जाहीर झाली आहे. या संदर्भात ट्रस्टने एक प्रसिद्धीपत्रक काढून माहिती दिली आहे. श्री सिद्धिविनायक ट्रस्ट बोर्डाने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये १० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.


पूरग्रस्तांना जाहीर झालेली मदत


लालबागचा राजा : ५० लाख रुपये


गजानन महाराज मंदिर ट्रस्ट, शेगाव : १ कोटी ११ लाख रुपये


विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट, पंढरपूर : १ कोटी रुपये


साईबाबा मंदिर ट्रस्ट, शिर्डी : १ कोटी रुपये


तुळजापूर मंदिर ट्रस्ट : १ कोटी रुपये


श्री सिद्धिविनायक ट्रस्ट : १० कोटी रुपये


Comments
Add Comment

12th Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही आहे महत्त्वाची बातमी...

अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे बारावी परीक्षा अर्ज भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मुंबई : राज्यात होत असलेली

ट्रेनची टक्कर थांबवणार! 'कवच' प्रणालीमुळे आता अपघात टळणार का? मध्य रेल्वेने केला मोठा दावा

मध्य रेल्वेचा ऐतिहासिक टप्पा: मुंबई विभागात 'कवच' प्रणालीची यशस्वी चाचणी! सर्व ५ विभागांमध्ये 'कवच' लोको चाचण्या

ठाण्यात आज ऑरेंज, तर उद्या यलो अलर्ट

जिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश ठाणे : प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या

वरळी दुग्धशाळेच्या जागेवर मोठी व्यावसायिक संकुले उभारली जाणार

मुंबई : वरळी दुग्धशाळेच्या जागेवर मोठी व्यावसायिक संकुले उभारली जाणार आहेत. जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून

कांजूरमार्ग ते बदलापूर प्रवास होणार जलद, सोपा

मेट्रो १४ असणार देशातील सर्वात लांब मेट्रो मार्ग मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) बदलापूर

म्हाडा राज्यात साडेअकरा हजार घरे बांधणार

मुंबईत सर्वसामान्यांसाठी १ हजार ४७४ घरे मुंबई : म्हाडाकडून चालू आर्थिक वर्षांत सामान्यांसाठी किती घरे उपलब्ध