नवी मुंबईसह सर्व महापालिकांवर महायुतीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार

नवी मुंबई : नवी मुंबईतील गरजेपोटी बांधलेली घरे आपण नियमित करण्याचा निर्णय घेतला. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचे आदेश दिले आहेत आणि तो निर्णय लवकरच होईल. शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी समिती गठित केली असून, त्यानुसार बदल केले जातील. अटल सेतूमुळे नवी मुंबईमध्ये जलदगतीने पोहोचणे शक्य होत आहे. मेट्रोचे जाळे, नवीन रस्ते अशी सगळी कामे आपण करत आहोत. या सर्वांच्या बळावर नवी मुंबई मनपा सहित सर्व मनपांवर महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे, असा निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.


लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असून नेत्यांनी आता कार्यकर्त्यांना निवडून आणायचे आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने कामाला लागण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. ते नवी मुंबईत बोलत होते.


अतिवृष्टी व पुरामुळे मराठवाड्यात मोठे नुकसान झाले असून, काही भागातील पूर परिस्थिती अद्यापही कायम आहे. अशा अवघड परिस्थितीत मी स्वतः अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देऊन आलो. त्यांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही, तर त्यांना नक्की मदत करणार. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, आजही इथे वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्यांचाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येक आपत्तीमध्ये धावून जाण्याचे काम शिवसैनिक करत असतो, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Navi Mumbai News : JNPAची जागतिक भरारी, जगातील टॉप-३० कंटेनर बंदरांमध्ये २१वे स्थान; सात स्थानांची झेप

नवी मुंबई : भारताच्या सागरी व्यापारासाठी महत्त्वाची असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीने (JNPA) जागतिक स्तरावर

Milk adulteration in Navi Mumbai : नवी मुंबईतील महापेतून लाखो रुपयांचा भेसळ केलेल्या दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त

महापे : नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरातील पी. के. डेअरीवर धाड टाकून अन्न व औषध प्रशासनाने

Navi Mumbai Traffic : पाम बीच रोडवर 15 आणि 16 ऑगस्टला वाहतूक निर्बंध; वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

नवी मुंबई : स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील

Navi Mumbai Railway : ऐरोली ते बेलापूर रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट; प्रवाशांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

नवी मुंबई : ऐरोली ते बेलापूरदरम्यानच्या सर्व रेल्वे स्थानकांचा लवकरच कायापालट होणार आहे. या स्थानकांमधील

Devendra Fadnavis : भारताच्या भविष्यातील विकासाचे मुख्य केंद्र नवी मुंबईच; "मेघालय भवन" विकास संस्कृती आणि एकात्मतेचा संगम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'मेघालय भवन' उभारणीसाठी जमीन हस्तांतरण व भूमीपूजन सोहळा

Koparkhairane Connecting Link : नवी मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! कोपरखैरणेतील 'कनेक्टिंग लिंक' पुलाचे गणेश नाईक यांच्या हस्ते लोकार्पण

नवी मुंबई : नवी मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या कोपरखैरणे आणि परिसरातील नागरिकांना आता वाहतूककोंडीच्या त्रासातून