'आरएसएस' कार्यक्रमाला सरन्यायाधीशांच्या मातोश्रींच्या उपस्थितीवरून मोठा सस्पेन्स!

ते पत्र खोटं! सरन्यायाधीशांच्या मातोश्री संघाच्या कार्यक्रमाला जाणार! राजेंद्र गवईंचा खुलासा


अमरावती: देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मातोश्री डॉ. कमलताई गवई यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमातील उपस्थितीवरून अमरावतीत मोठा वाद निर्माण झाला आहे. सुरुवातीला कमलताई गवई या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर डॉ. कमलताई गवई यांच्या नावाचे एक पत्र व्हायरल झाले, ज्यात त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले होते. आता याच पत्रामुळे एक नवा 'ट्विस्ट' आला आहे.



काय आहे नेमका 'सस्पेन्स'?


आरएसएसच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद निर्माण झालेला असतानाच, त्यांच्या नावाने व्हायरल होत असलेले 'कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही' हे पत्र खोटे (फेक) असल्याची माहिती पुढे येत आहे. इतकेच नाही, तर डॉ. कमलताई गवई नेमक्या कुठे आहेत, याची माहिती खुद्द त्यांचे पुत्र राजेंद्र गवई यांनाही नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे या संपूर्ण प्रकरणातील सस्पेन्स चांगलाच वाढला आहे.



राजेंद्र गवई यांचा मोठा खुलासा


डॉ. कमलताई गवई यांचे पुत्र राजेंद्र गवई यांनी या संपूर्ण वादावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, "पाच तारखेला संघाचा कार्यक्रम अमरावतीला होत आहे आणि त्याचे निमंत्रण आईसाहेबांना मिळाले आहे. त्यांनी ते निमंत्रण स्वीकारले आहे."


?si=JcBoJqhoEtiHQT79

गवई कुटुंबाचे संघासोबतच्या संबंधांबद्दल बोलताना ते म्हणाले की, "संघाच्या मुख्य कार्यक्रमांना यापूर्वी आदरणीय दिवंगत रिपब्लिकन पक्षाचे नेते राजाभाऊ खोब्रागडे आणि दिवंगत दादासाहेब गवई हे देखील नागपूरमध्ये गेले होते. गवई परिवाराचे पक्षविरहित संबंध आहेत." त्यांनी उदाहरणे देत स्पष्ट केले की, इंदिरा गांधींसोबत दादासाहेब गवईंचे अतिशय जवळचे संबंध होते आणि विदर्भातील नेते गंगाधर फडणवीस यांच्यासोबत देखील दादासाहेबांचे चांगले संबंध होते. "कार्यक्रमाला गेले म्हणजे विचारधारा बदलेल असं मुळीच नाही," असेही राजेंद्र गवई यांनी स्पष्ट केले.



'विरोधकांच्या पोटात दुखते आहे!'


राजेंद्र गवई यांनी डॉ. कमलताई गवई यांच्या उपस्थितीचे समर्थन केले. "त्या कार्यक्रमात गेले पाहिजे, अशा मताचा मी आहे. आमची मैत्री कायम राहील, परंतु आमची विचारधारा पक्की आहे. गवई साहेबांच्या विरोधकांच्या पोटात दुखत आहे, त्यामुळे उलट्या-सुलट्या टीका सोशल मीडियावर केल्या जात आहेत. भूषण गवई मोठ्या पदावर गेल्यामुळे मुद्दामून विरोधक टीका-टिप्पणी करत आहेत," असा थेट आरोप त्यांनी केला.


राजेंद्र गवई यांनी पुढे सांगितले की, "मी आईसाहेबांना सांगेल, आईसाहेबांनी निर्णय घेतलेला आहे. एक मुलगा म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले. या खुलाशानंतर डॉ. कमलताई गवई नेमक्या कधी आणि कुठे संपर्क साधतात आणि या प्रकरणावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त