'आरएसएस' कार्यक्रमाला सरन्यायाधीशांच्या मातोश्रींच्या उपस्थितीवरून मोठा सस्पेन्स!

ते पत्र खोटं! सरन्यायाधीशांच्या मातोश्री संघाच्या कार्यक्रमाला जाणार! राजेंद्र गवईंचा खुलासा


अमरावती: देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मातोश्री डॉ. कमलताई गवई यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमातील उपस्थितीवरून अमरावतीत मोठा वाद निर्माण झाला आहे. सुरुवातीला कमलताई गवई या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर डॉ. कमलताई गवई यांच्या नावाचे एक पत्र व्हायरल झाले, ज्यात त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले होते. आता याच पत्रामुळे एक नवा 'ट्विस्ट' आला आहे.



काय आहे नेमका 'सस्पेन्स'?


आरएसएसच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद निर्माण झालेला असतानाच, त्यांच्या नावाने व्हायरल होत असलेले 'कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही' हे पत्र खोटे (फेक) असल्याची माहिती पुढे येत आहे. इतकेच नाही, तर डॉ. कमलताई गवई नेमक्या कुठे आहेत, याची माहिती खुद्द त्यांचे पुत्र राजेंद्र गवई यांनाही नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे या संपूर्ण प्रकरणातील सस्पेन्स चांगलाच वाढला आहे.



राजेंद्र गवई यांचा मोठा खुलासा


डॉ. कमलताई गवई यांचे पुत्र राजेंद्र गवई यांनी या संपूर्ण वादावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, "पाच तारखेला संघाचा कार्यक्रम अमरावतीला होत आहे आणि त्याचे निमंत्रण आईसाहेबांना मिळाले आहे. त्यांनी ते निमंत्रण स्वीकारले आहे."


?si=JcBoJqhoEtiHQT79

गवई कुटुंबाचे संघासोबतच्या संबंधांबद्दल बोलताना ते म्हणाले की, "संघाच्या मुख्य कार्यक्रमांना यापूर्वी आदरणीय दिवंगत रिपब्लिकन पक्षाचे नेते राजाभाऊ खोब्रागडे आणि दिवंगत दादासाहेब गवई हे देखील नागपूरमध्ये गेले होते. गवई परिवाराचे पक्षविरहित संबंध आहेत." त्यांनी उदाहरणे देत स्पष्ट केले की, इंदिरा गांधींसोबत दादासाहेब गवईंचे अतिशय जवळचे संबंध होते आणि विदर्भातील नेते गंगाधर फडणवीस यांच्यासोबत देखील दादासाहेबांचे चांगले संबंध होते. "कार्यक्रमाला गेले म्हणजे विचारधारा बदलेल असं मुळीच नाही," असेही राजेंद्र गवई यांनी स्पष्ट केले.



'विरोधकांच्या पोटात दुखते आहे!'


राजेंद्र गवई यांनी डॉ. कमलताई गवई यांच्या उपस्थितीचे समर्थन केले. "त्या कार्यक्रमात गेले पाहिजे, अशा मताचा मी आहे. आमची मैत्री कायम राहील, परंतु आमची विचारधारा पक्की आहे. गवई साहेबांच्या विरोधकांच्या पोटात दुखत आहे, त्यामुळे उलट्या-सुलट्या टीका सोशल मीडियावर केल्या जात आहेत. भूषण गवई मोठ्या पदावर गेल्यामुळे मुद्दामून विरोधक टीका-टिप्पणी करत आहेत," असा थेट आरोप त्यांनी केला.


राजेंद्र गवई यांनी पुढे सांगितले की, "मी आईसाहेबांना सांगेल, आईसाहेबांनी निर्णय घेतलेला आहे. एक मुलगा म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले. या खुलाशानंतर डॉ. कमलताई गवई नेमक्या कधी आणि कुठे संपर्क साधतात आणि या प्रकरणावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

MPSC Nipun Setu : एमपीएससीच्या अंतिम निवडीत हुकलेल्या उमेदवारांना 'निपुण सेतू'द्वारे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध स्पर्धा परीक्षांच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचूनही अंतिम

Devendra Fadnavis : नीट' परीक्षेच्या नियोजनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई : गेल्या महिन्यात झालेल्या पेपरफुटीच्या गंभीर प्रकरणामुळे 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'ने (एनटीए) रद्द केलेली

Jalna : पोलीस भरती होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं, सराव जीवावर बेतला

जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. लहानपणापासून एकचं

Crime News : रात्री वडिलांनी चापट मारली, घरात सकाळी भयानक दृश्य समोर आलं, मॅकेनिकल इंजिनिअर मुलाचं वडिलांसोबत भयंकर कृत्य

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान भावाला जास्त जीव लावला जातो, हा राग मनात

वसतिगृहाच्या टेरेसवर झोपलेल्या विद्यार्थ्याचा खून, पोलिसांकडून तपास सुरु

पुणे : पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोनवडी येथील

Transport Minister Pratap Sarnaik : एसटीची स्थानके आणि बसेसची दर चार तासांनी स्वच्छता होणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; जागतिक पर्यावरण दिनी राज्यव्यापी आधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ मुंबई :