12th Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही आहे महत्त्वाची बातमी...

अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे बारावी परीक्षा अर्ज भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ


मुंबई : राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा अर्ज भरण्यास अडचण येत असल्याने त्याला दि. २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य परीक्षा मंडळाने घेतला आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना दूरध्वनी करून मुदतवाढ देण्याबाबत निर्देश दिले होते.


राज्यातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना परीक्षा अर्ज भरण्याची उद्या दि. ३० सप्टेंबर रोजी शेवटची मुदत आहे. मात्र मराठवाडा, नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर आणि राज्यात होत असलेली अतिवृष्टिमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मुदतीत परीक्षेसाठी अर्ज भरणे शक्य नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी, पालकांनी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांना संपर्क करून अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती.


त्यानुसार उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शिक्षण मंत्री श्री. भुसे यांना बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत निर्णय घेण्यास सांगितले. शिक्षण मंत्र्यांनी लगेचच राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संपर्क केला आणि अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचे निर्देशही दिले. त्यानुसार शिक्षण विभागामार्फत २० ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात शिक्षण विभागामार्फत परिपत्रक जारी करण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्याचबरोबर बाह्य पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील अर्ज भरण्याची मुदत १५ ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे तसेच नवीन परीक्षा केंद्रासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत १० ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे.

Comments
Add Comment

कुलाबा कॉजवे परिसरातील ६७ अनधिकृत फेरीवाल्यांना हटवले, महानगरपालिकेच्या ए विभागाकडून कारवाई

मुंबई (खास प्रतिनिधी): कुलाबा कॉजवे परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात त्वरीत कारवाई करावी अन्यथा आंदोलन

संजय गांधी उद्यानातून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या प्रवेशद्वारावर घडणार वाघाचे दर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी): गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीखालून

गोवंडी शताब्दी रुग्णालयासाठी तेरणा आणि सुरभी एज्युकेशन संस्थेत स्पर्धा

​मुंबई (सचिन धानजी): मुंबई महानगरपालिकेची चार रुग्णालये सार्वजनिक खासगी सहभाग तत्वावर चालवण्यास देण्याचा

बारावी परीक्षेच्या अर्जांना मुदतवाढ

मुंबई  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी - मार्च २०२६ मध्ये घेतल्या

स्थानिक विरोधामुळे मेट्रो कारशेडचा 'उत्तन-डोंगरी' प्लॅन रद्द!

७३३ कोटींच्या प्रकल्पाला एमएमआरडीएकडून मूठमाती; झाडे वाचवण्यासाठी नागरिकांची मोठी लढाई मुंबई: उत्तन-डोंगरी

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कामगार नेते शशांक राव यांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे बेस्ट प्रशासन महापालिका व सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी